Crime News : बाळाचा जन्म झाला, पण आईचा जीव गेला! खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; चंद्रपुरातील घटना हेलावून टाकणारी
Crime News : महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी कसा संघर्ष करावा लागतोय, याचे एक अत्यंत हृदयद्रावक आणि हेलावून टाकणारे उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आले आहे.

Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका( Ambulance )वेळेत गावात पोहोचू न शकल्याने प्रसूतीनंतर एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि मूलभूत पायाभूत सुविधांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Crime News)
प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव, मदत मिळण्यापूर्वीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, जिवती तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील दुर्गम घोडनकप्पी गावात राहणाऱ्या संगीता गेडाम यांची आठव्या महिन्यात घरीच प्रसूती झाली. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. कुटुंबीयांनी तत्काळ आरोग्य विभागाला माहिती दिली, मात्र गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकली नाही. उपचाराअभावी संगीताचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Crime News)
आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण (Crime News)
जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, गर्भधारणेदरम्यान महिलेची नियमित तपासणी करण्यात येत होती. गावात रस्ता नसल्याने प्रसूतीपूर्वी माहेरी जाण्याचा किंवा पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राहण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र संबंधित महिलेने तो प्रस्ताव नाकारला होता. (Crime News)
त्यानंतर आठव्या महिन्यातच अचानक प्रसूती झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी कसा संघर्ष करावा लागतोय, याचे एक अत्यंत हृदयद्रावक आणि हेलावून टाकणारे उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आले आहे. (Crime News)
हिंगोलीतील घटनेची आठवण (Crime News)
यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचता आले नव्हते. (Crime News)
परिणामी तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर तीव्र टीका झाली होती. या ताज्या घटनेनंतर दुर्गम भागातील रस्ते, आपत्कालीन आरोग्य सेवा आणि मातृसुरक्षेच्या सुविधांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. (Crime News)





