“माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय का?” ; राहुल गांधींचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाड यांचा सवाल ; राजीनाम्याची मागणी

Jitendra Awhad on Manikrao Kokate । राज्यातील मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिकांची बनावट कागदपत्र तयार करून त्या मिळवल्याचा आरोप कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. याच प्रकणी दोघांनाही प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयानेदिलेल्या या निर्णयानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ मार्चपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विधीमंडळ कामगार सल्लागार समितीची बैठक पडणार आहे. या बैठकीला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे बैठकीला उपस्थित नाहीत. मात्र जितेंद्र आव्हाड हे विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. याविषयी माहिती त्यांनी दिली आहे.
माणिकराव कोकाटे यांना एक वेगळा न्याय का? Jitendra Awhad on Manikrao Kokate ।
नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या केसच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सुनील केदार आणि राहुल गांधी यांना एक वेगळा न्याय आणि सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना एक वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे.
नेमकं प्रकरण काय? Jitendra Awhad on Manikrao Kokate ।
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.





