Bumrah Ruled Out : टीम इंडियाला मोठा धक्का! भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह निर्णायक सामन्यातून बाहेर, नेमकं कारण काय?
Bumrah Ruled Out : भारताचा हुकमी एक्का आणि जगातील अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे या निर्णायक सामन्यातून बाहेर पडला आहे.

Jasprit Bumrah Injured Ruled Out Of IND vs ENG 3rd ODI Lords : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. भारताचा हुकमी एक्का आणि जगातील अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे या निर्णायक सामन्यातून बाहेर पडला आहे. मालिकेचा थरार १-१ अशा बरोबरीत असताना बुमराहचे बाहेर जाणे टीम इंडियासाठी खूप मोठा झटका मानला जात आहे.
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर कर्णधार आणि बीसीसीआयचे अपडेट –
टॉसच्या वेळी बोलताना कर्णधार शुबमन गिलने सांगितले की, जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण (Fielding) करताना बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. गुडघ्याला आलेल्या सूजेमुळे तो या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. बुमराहसोबतच दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे देखील या सामन्यात खेळत नाहीयेत.
भारतीय संघात तब्बल ३ मोठे बदल; अर्शदीपची एन्ट्री –
Presenting #TeamIndia‘s Playing XI for the 3️⃣rd ODI 🙌
Jasprit Bumrah had an impact injury on his left knee while fielding in the second ODI in Cardiff. He was not available for selection for the third ODI due to reactive swelling in his left knee.
Updates ▶️… pic.twitter.com/RJdchL62hv
— BCCI (@BCCI) July 19, 2026
बुमराह, सुंदर आणि दुबे बाहेर पडल्यामुळे भारतीय संघात ३ मोठे बदल करण्यात आले आहेत. या तिघांच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुल, प्रिन्स यादव आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांचा समावेश करण्यात आला आहे. अर्शदीपला या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत संधी मिळाली नव्हती, तो आता थेट निर्णायक सामन्यात खेळत आहे.
४ वेगवान गोलंदाजांसह उतरली टीम इंडिया –
कर्णधार शुभमन गिलने रणनीती स्पष्ट करताना सांगितले की, “आम्हाला लॉर्ड्सच्या मैदानावर ४ मुख्य वेगवान गोलंदाजांसह उतरायचे होते. कारण येथे मधल्या षटकांत फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. गेल्या सामन्यात आमची २५ षटकांपर्यंत स्थिती मजबूत होती, पण नंतर लागोपाठ विकेट्स गेल्या. आज जर आम्ही तशाच चांगल्या स्थितीत पोहोचलो, तर २८० ते ३०० धावांचे मोठे लक्ष्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”





