Jaspal Rana blasts NRAI selection policy :- नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या (NRAI) धोरणामध्ये दर सहा महिन्यांनी बदल होतो. फेडरेशनने सातत्याने धोरणात बदल केल्यामुळे प्रतिभावान नेमबाजांचे नुकसान होत असून हे असेच सुरु राहिले तर याचा फटका भविष्यात देखील तरुण नेमबाजांना बसेल, अशी बोचरी टीका पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २ कांस्यपदके जिंकणाऱ्या मनू भाकरचे प्रशिक्षक व आशियाई पदक विजेते जसपाल राणा यांनी केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत एकही पदक मिळाले नव्हते. त्यामुळे एनआरएआयने सन २०२१ मध्ये धोरणात बदल केला होता. ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी कोटा पद्धत निश्चित करण्यात आली आहे. या कोटा मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बोनस गुणांना कात्री लावण्यात आली. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर खेळाडूंच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली. यावरून देखील टीकेची झोड उडाली होती. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी अस्पष्ट मूल्यांकनाच्या आधारे नेमबाजांच्या कामगिरीला अंतिम रूप देण्यात आले होते, त्यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडुंमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे टीका राणा यांनी केली. याचबरोबरीने मी बदलांच्या विरोधात नाही, मात्र बदल करताना त्यामध्ये सातत्य आवश्यक असल्याचे देखील राणा यांनी सांगितले. सौरभ चौधरी, जितू राय कुठे आहेत ? टोकियो ऑलिम्पिकच्या पुरुष गटात १० मीटर एअर पिस्तूल या प्रकाराजाच्या अंतिम फेरीत सौरभ चौधरीने स्थान मिळविले होते. आशियाई खेळांमध्ये जितू रायने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. मात्र हे खेळाडू प्रतिभावान असून देखील काही वर्षात मागे का पडले? असा सवाल देखील जसपाल राणा यांनी उपस्थित केला. हे खेळाडू प्रतिभाशाली होते म्हणूनच त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले. मात्र, आजच्या घडीला त्यांच्याविषयी कुणीही चर्चा करत नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफलमध्ये अर्जुन बाबूताला चौथे स्थान मिळाले होते. त्याचे पदक देखील अगदी थोड्या अंतराने गेले होते. आज त्याच्याविषयी कोणतीच चारचा होताना दिसत नाही. हे खेळाडू देखील प्रतिभावान आहेत. त्याच्या प्रतिभेचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे जसपाल राणा यांनी म्हटले. Vinesh Phogat Prize Money : काय, विनेश फोगटला बक्षीस म्हणून 16 कोटी मिळाले? जाणून घ्या, व्हायरल दाव्याचे सत्य… खेळाडूंना पदक मिळविल्यानंतर देखील संघर्ष देशासाठी खेळाडू जीवाची बाजी लावून खेळत असतात. देशासाठी पदक मिळावे यासाठी रात्रंदिवस ते सराव करतात. मोठ्या स्पर्धामध्ये कामगिरी करण्याचे त्यांच्यावर देखील मोठे दडपण असते. तरी देखील खेळाडू आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर देशाला पदक मिळवून देतात. अशा खेळाडूंसाठी काही तरी सुरक्षित यंत्रणा आवश्यक असल्याचे जसपाल राणा यांनी म्हटले आहे. त्यामुळे विजेत्या खेळाडूंना देखील पुन्हा पहिल्यापासून संघर्ष करावा लागणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला मनू भाकरने दोन कांस्य पदके मिळवून दिली आहेत. स्पर्धेनंतर तिला तीन महिन्याची सुट्टी घेतली आहे. मात्र सुट्टी संपल्यानंतर तिला राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.