महागड्या गाड्या आणि आधुनिक शस्त्रांचा छंद ; कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद ? वाचा

Jammu Kashmir Terror Attack । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मधील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. १० जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ने घेतली आहे. जी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची एक आघाडी आहे. जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवादी कारवायांमागे दहशतवादी सैफुल्ला खालिदचे डोके असल्याचे उघड झाले आहे. तो या हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचे म्हटले जात आहे.
सैफुल्ला खालिद हाफिज सईदच्या खूप जवळचा Jammu Kashmir Terror Attack ।
लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद हा सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखला जातो. तो भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदच्या खूप जवळचा आहे. भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव घेतले गेले आहे. तो नेहमीच आलिशान गाड्यांमधून प्रवास करतो. लष्कराचे दहशतवादी नेहमीच त्याच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असतात. पाकिस्तानमधील त्याचा प्रभाव एवढा आहे कि त्याठिकाणचे लष्करी अधिकारीही त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात. तो पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना भडकवण्याचे काम करते.
ताज्या दहशतवादी हल्ल्याच्या फक्त दोन महिने आधी, सैफुल्ला खालिद पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूर याठिकाणी पोहोचला होता, जिथे पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन आहे. तिथे पाकिस्तानी सैन्याचे कर्नल जाहिद जरीन खट्टक यांनी त्यांना जिहादी भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. तो त्याठिकाणी पोहोचल्यानंतर कर्नलने स्वतः त्याच्यावर फुले उधळली. यानंतर, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध जोरदार चिथावणी दिली. त्याने असेही म्हटले की “जितके जास्त भारतीय सैनिक ते मारतील तितके जास्त अल्लाह त्यांना बक्षीस देईल.”
२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आम्ही काश्मीर काबीज करू Jammu Kashmir Terror Attack ।
त्याचप्रमाणे, पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा याठिकाणी झालेल्या बैठकीत त्याने भारताविरुद्ध विष ओकले होते. त्यावर लिहिले होते, “मी वचन देतो की आज २ फेब्रुवारी २०२५ आहे.” २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आम्ही काश्मीर काबीज करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. येणाऱ्या काळात आमचे मुजाहिदीन त्यांचे हल्ले तीव्र करतील. आम्हाला आशा आहे की २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर मुक्त होईल.” ही बैठक आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराने संयुक्तपणे आयोजित केली होती. त्याचे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी जमले होते.
एका गुप्तचर अहवालानुसार, गेल्या वर्षी शेकडो पाकिस्तानी मुलांनी अबोटाबादच्या जंगलात आयोजित केलेल्या दहशतवादी छावणीत भाग घेतला होता. हे लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखा पीएमएमएल आणि एसएमएलने आयोजित केले होते. यामध्ये सैफुल्लाह कसुरी देखील उपस्थित होता. त्याने या छावणीतील मुलांना दहशतवादी हल्ल्यांसाठी निवडले होते, ज्यांना नंतर लक्ष्य हत्या करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. इथेही सैफुल्लाहने भारताविरुद्ध भडकाऊ भाषण देऊन तिथे उपस्थित असलेल्या मुलांना भडकवले होते.
या मुलांना दहशतवादी प्रशिक्षण दिल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने त्यांना सीमेपलीकडून घुसखोरी करण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संविधानात सुधारणा करून जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्यात आले. यानंतर, आयएसआयने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांना कव्हर करण्यासाठी टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ची स्थापना केली. पाकिस्तानी सैन्य या दहशतवादी संघटनेला मदत करते. लष्कराच्या निधीच्या माध्यमांचा वापर केला जातो.
गृह मंत्रालयाने राज्यसभेत असेही सांगितले होते की, “द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची एक आघाडी संघटना आहे.” टीआरएफ २०१९ मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून ते जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले करत आहे. टीआरएफचे ‘हिट स्क्वॉड’ आणि ‘फाल्कन स्क्वॉड’ येत्या काळात काश्मीरमध्ये मोठे आव्हान निर्माण करू शकतात. या दहशतवादी मॉड्यूलला लक्ष्य हत्या करण्याचे आणि जंगलात आणि उंच भागात लपण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.





