“इतकी थट्टा, एवढा अपमान, या खुर्चीवर बसून मी खूप दुःखी झालो…” ; राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर असं का म्हणाले?

Jagdeep Dhankhar । आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच काँग्रेससह संपूर्ण विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. त्यावेळी सभापती जगदीप धनखर यांनी विरोधकांच्या या कृतीवर प्रतिक्रिया दिली. धखड यांनी,”संविधानाची एवढी खिल्ली उडवली जात आहे आणि अपमान केला जात आहे याचे मला दु:ख आहे. हे पुस्तक हातात धरण्यासाठी नसून जगण्यासाठी आहे.” असे म्हटले.
राज्यघटनेचा यापेक्षा मोठा अपमान होऊ शकत नाही Jagdeep Dhankhar ।
राज्यसभेत बोलताना सभापती म्हणाले,” विरोधकांचा वॉकआऊट अत्यंत क्लेशदायक आणि वेदनादायी असल्याचेम्हटले. तसेच पुढे सभापती जगदीप धनखर म्हणाले की, त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना चर्चेदरम्यान कोणताही अडथळा न आणता बोलण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली होती. भारतीय राज्यघटनेचा यापेक्षा मोठा अपमान होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, हे वरचे सभागृह आहे आणि त्यातून देशाला मार्गदर्शन करायचे आहे. विरोधी सदस्यांच्या या वर्तनाचा आपण निषेध करतो, असे जगदीप धनखर म्हणाले. ते म्हणाले की, विरोधकांच्या या वर्तनामुळे देशातील 140 कोटी जनता दुखावणार आहे. ते म्हणाले की, सभागृहात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती आणि जेव्हा विरोधकांनी आपले म्हणणे पूर्णपणे मांडले होते, तेव्हा त्यांनी सत्ताधाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे.
संविधानाचा एवढी विटंबना, एवढा अपमान होतोय Jagdeep Dhankhar ।
अध्यक्ष म्हणाले, ‘त्यांनी भारतीय राज्यघटनेला आव्हान देऊन तिची भावना दुखावली आहे. या खुर्चीवर बसून मला खूप वाईट वाटतं की संविधानाचा एवढी विटंबना, एवढा अपमान होतोय…. भारतीय राज्यघटना हे हातात ठेवायचे पुस्तक नसून जगण्यासाठीचे पुस्तक आहे. त्यांनी विरोधकांना आत्मपरीक्षण करा, त्यांच्या अंतःकरणाचा शोध घ्या आणि कर्तव्य बजावा” असा सल्ला दिला. पंतप्रधान मोदी चर्चेला उत्तर देत असताना प्रथम विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अध्यक्ष जगदीप धनखर यांच्याकडे काही बोलण्याची परवानगी मागितली. मात्र ती परवानगी न दिल्याने विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
त्यांच्या घोषणाबाजीत पंतप्रधानांनी भाषण सुरू ठेवताच मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला. विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला, तेव्हा पंतप्रधान म्हणाले, ‘खोटे पसरवणाऱ्यांमध्ये सत्य ऐकण्याची ताकदही नाही, हे देश पाहत आहे. …ज्यांच्यात हिम्मत नाही…त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्याची हिम्मत नाही.” असा टोला देखील त्यांनी लगावला.





