‘तिरुपती प्रकरणाचा बदला लवकरच घेणार…’ ; जगद्गुरू रामभद्राचार्य यांची हिंदू सनातन मंडळाची घोषणा

Jagatguru Rambhadracharya । तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी वापरल्याच्या मुद्द्यावर जगतगुरु रामभद्राचार्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी हिंदू सनातन मंडळाची घोषणा देखील केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामभद्राचार्य म्हणाले की, “तिरुपती तिरुमला मंदिरातील प्रसादात भेसळ केल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ख्रिश्चन आणि इस्लामिक संस्कृती हिंदू धर्माला धक्का देत आहे. ख्रिस्ती सनातनच्या भावना दुखावत आहेत.” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “आगामी काळात सनातन मंडळ सर्व मंदिरांवर नियंत्रण ठेवणार आहे. या अपमानाचा बदला घेतला जाईल, कसा बदला घेतला जाईल हे येणारा काळच सांगेल. याबाबत आमची तयारी सुरू आहे. हे मोठे षडयंत्र आहे. हिंदू सनातन मंडळाची स्थापना केली जाईल”, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारला आशीर्वाद दिले Jagatguru Rambhadracharya ।
जगतगुरु रामभद्राचार्य यांनीही तिरुपती बोर्डातील बदलांबाबतदेखील यावेळी माहिती दिली. तसेच ‘मंडळात बदल व्हायला हवेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याबरोबरच त्यांनी “महाराष्ट्रात हिंदू सनातन धर्मासाठी काम करणारे सरकार ज्यांनी निवडून दिले त्यांना मी आशीर्वाद देतो. सध्या जे सत्तेत आहे (शिंदे) ते निवडून आले आहेत. ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसला फाडून टाका. तुकडे टोळी चालवत आहे, मी त्यांच्याशी सहमत आहे. पंतप्रधानांनी ते बरोबर सांगितले आहे.”
बसपा आणि सपा समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती Jagatguru Rambhadracharya ।
रामभद्राचार्य त्यांच्या वक्तव्यांमुळे वेळोवेळी चर्चेत राहतात. गेल्या महिन्यात त्यांनी मुलायमसिंह यादव आणि कांशीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने जगद्गुरू रामभद्राचार्य यांना नोटीस बजावली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने रामभद्राचार्य यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले होते. याशिवाय रामभद्राचार्य यांनी बिहारमधील एका विशिष्ट जातीवर भाष्य करत जय श्री राम न म्हणणारे विशिष्ट जातीचे असल्याचे म्हटले होते. या दोन्ही विधानांवरून सपा-बसपा समर्थकांमध्ये प्रचंड रोष असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.





