Wind Energy special story : 2030 पर्यंत अपारंपारिक उर्जा स्त्रोतामधून ५०० गिगा वॅट एवढी एनर्जी मिळवणं शक्य आहे का? वाचा सविस्तर

पवनचक्की. वाल्मीक कराडला औष्णिक उर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणामुळे बीडमधील पवनचिक्की आणि त्या मागचे अर्थकारण सर्वांसमोर आले. याची मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील झाली. बीड, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यात पवनचिक्की गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अपारंपारिक उर्जाचा महत्वाचा स्त्रोत म्हणून पवनचिक्की अर्थात विंड एनर्जीकडे पाहिले जाते. पवनचिक्की बनवण्यासाठीचे साहित्य परदेशातून येऊन मग त्यानंतर भारतात अस्मबली केले जाते. पण आनंदाची गोष्ट म्हणजे भारतातील काही कंपन्या आता स्वतः पवनचिक्कीचे साहित्य बनवत आहेत. यामुळे भारतात भविष्यात पवनचिक्कीचे पार्ट बनविण्याचा व्यवसाय तेजीत असणार असे सांगण्यात येत आहे. काही स्मॅाल स्केल कंपन्या पवनचिक्कीचे पार्ट बनवून टाटा कंपनी सारख्या कंपनीना सप्लाय करत आहेत. यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्याही संधी उपलब्ध होणार आहेत.
थोडक्यात
पवनचिक्कीचा शोध शास्त्रज्ञ जेम्स ब्लिथ यांनी १८८७ मध्ये लावला. त्यानंतरच्या काळात भारतात पवनचिक्की निर्मिती व्हायला सुरूवात झाली. पवनचिक्कीपासून वीजनिर्मिती करण्यात येते. पवनचिक्की ही डोंगरावर जिथे वाऱ्यांची गती अधिक असेल तिथे बसवली जाते. वाऱ्याच्या गतीवर पवनचिक्की फिरते. पवनचिक्कीचे फाऊंडेशन उत्तम दर्जाचे असते. पवनचिक्कीमध्ये हब, निसेल, ब्लेड, टॅावर हे महत्वाचे घटक असतात. मूळात पवनचिक्की उंचीने आणि आकाराने मोठ्या असतात. तसेच हब, ब्लेड, निसेल आणि टॅावर हे आकाराने मोठे असते. पवनचिक्कीच्या आकारवर आणि ज्या भागात पवनचिक्की बसवली जाणार आहे, तेथील हवेवर किंवा वाऱ्याच्या दिशेनुसार ती बसवली जाते. सर्वसाधारपणे २.५ ते ३ मेगावॅटचे पवनचिक्कीचे टरबाईन असतात. पवनचिक्कीची निर्मिती करणारी सुझलॅान ही पहिली कंपनी आहे.
पवनचिक्की काम कशी करते
पवनचिक्की उभारण्यात आलेल्या डोंगरावर वाऱ्याचा वेगानुसार पवनचिक्कीचे पाते फिरतात. त्यानंतर एक एनर्जी तयार होते. आणि ती एनर्जी साठवून त्यातून इलेक्ट्रीक एनर्जी तयार केली जाते. थोडक्यात सांगायचे झाल्यास वेगवान गतीने वारे पवनचिक्कीच्या पात्यांवर आदळतात. त्यावेळी कॅायनॅटिक एनर्जी तयार होते. त्यानंतर ही एनर्जी मॅकेनिकल एनर्जीमध्ये रुपांतरित होते आणि शेवटी मॅकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रीकल एनर्जीमध्ये तयार होते. एक पवनचिक्की दररोज २.७ मेगावॅट एवढी एनर्जी एका तासांमध्ये तयार करत असते. म्हणजेच २,७०० किलो वॅट*२४ हव्हर्स अशी एनर्जी तयार होत असते. महाराष्ट्रात पवनचिक्की निर्मितीला खूप स्कोप आहे, तसेच त्याची मागणी देखील वाढत आहे.
एवढी एनर्जी तयार करणे शक्य होईल का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीIs it possible to get 500 gigawatts of energy from non-conventional energy sources by 2030? Read in detail तयार करण्याचे अपेक्षा ठेवलेली आहे. पण मूळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर एनर्जी तयार केली जाऊ शकते का? तर त्याचे उत्तर फार कमी असे आहे. याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे या क्षेत्रात ( विंड एनर्जी) भारताने उशिरा पाऊल ठेवले. सध्याच्या घडीला भारतात केवळ ४८ गिगा वॅट एवढीच एनर्जी तयार करण्यात आली आहे. म्हणजेच जर २०३० पर्यंत ५०० गिगा वॅट एनर्जी तयार करायची झाल्यास याची कॅप्यासिटी २ ते ३ पट्टींनी वाढवायला लागेल. पण हे शक्य होईल का तर येणारा काळाच सांगेल. तूर्तास २०३० पर्यंत या क्षेत्राने मोठी उभारी घेतली असेल आणि जग फार बदलेले दिसेल असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
पिक फॅक्टर का असतो?
पवनचिक्कीचे मॅाडेल त्यांच्या उंची आणि साईजनुसार तयार करण्यात येतात. एका पवनचिक्कीची किंमत ८ ते २५ कोटी रुपये एवढी असते. पवनचिक्कीमध्ये लोड फॅक्टर नावाचा एक भाग असतो. जो मॅकॅनिकल एनर्जी आणि इलेक्ट्रीकल एनर्जी यामध्ये समतोल राखण्याचे काम करतो. वर्षातील १२ महिन्यांपैकी ४ महिने हा लोड फॅक्टर शंभर टक्के असतो. त्यानंतर ८ महिने ३५ ते ४० टक्के असतो. लोड फॅक्टरला पीक फॅक्टर असे देखील म्हटले जाते.
रोजगाराच्या संधी
सध्याच्या घडीला पवनचिक्कीची निर्मिती करणाऱ्या काही कंपन्या देशात आहेत. महाराष्ट्रातही पवनचिक्कीची निर्मिती करणाऱ्या कंपन्या तयार होत आहेत. स्मॅाल स्केल कंपन्या पवनचिक्कीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करत आहेत. या कंपन्यांमध्ये रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. अॅटोमोबाईल किंवा मॅकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांची गरज अशा कंपन्यांना लागत आहे. परिमाणी रोजगारांच्या संधी या विद्यार्थ्यांना निर्माण होणार आहेत. केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालयाचे मंत्री प्रल्हाद जोशी हे आहेत, तर महाराष्ट्र राज्यात उर्जा विभाग देवेंद्र फडणीवस यांच्याकडे आहे.





