Chagan Bhujabal : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादीतून विरोध झालेला का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं म्हणाले….

पुणेः राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीचे सिनिअर नेते छगन भुजबळ यांची मंत्री पदी वर्णी लागणार असे बोलले जात होती. मात्र, त्यांना मंत्री पद मिळाले नाही, तेव्हापासून भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. अजित पवारांविषयी देखील भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखविली होती.
आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी स्वतः फोनवरून दिलगिरी व्यक्त करत संवाद साधल्याचे देखील भुजबळ यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. चर्चेत असलेल्या छगन भुजबळ हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत.
संजय राऊत यांनी काल माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्यूनियर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध झाला असा दावा काल केला होता. त्यांच्या विधानावर बोलताना छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
काका-पुतण्यांनी काय केलं? हे माहिती नाही. परंतु मी असं ऐकलं आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी ज्येष्ठ आणि प्रमुख माणूस त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. हे खरच आहे, मंत्रिमंडळात अनेक सिनिअर लोकं होते. त्यावेळेस एकनाथराव हे ज्युनिअर होते. मी 91 पासून मंत्री आहे. अजित पवार हे देखील 93 पासून मंत्री आहेत. मग, अशा वेळी त्यांनी हे म्हटलं हे सगळं सांभाळायचं असेल सिनिअर मनुष्य कोणीतरी पाहिजे. हे म्हणाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे भुजबळ म्हणाले.
….तर मला उलटा सुलटा
मला जर ईव्हीएमचा फायदा मिळाला असता तर मी दीड-दोन लाख मतांनी निवडून आलो असतो. 60 हजार मतांनी मी नेहमीच निवडून आलो. या वेळेला केवळ जरांगेमुळे माझे मताधिक्य कमी झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले. ईव्हीएममध्ये गडबड असती, तर जरांगे येऊ आणि आणखी कोणी येऊ ईव्हीएमने उलटा सुलटा करून मला दीड ते दोन लाख मताधिक्यावर पोहोचवले असते, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.





