Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामापूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढण्यात आले, अखेर या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) प्रशिक्षक मार्क बाउचर (Coach Boucher) याबाबत म्हणतात की, संघ व्यवस्थापनाला रोहित शर्मावरील दबाव कमी करायचा होता, त्यामुळे नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहित शर्माने 2013 ते 2023 पर्यंत मुंबई इंडियन्सची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र पुढील सत्रात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. मात्र, रोहित शर्मा सलामीवीर म्हणून संघाला चांगली सुरुवात देईल, अशी मुंबई इंडियन्सला पूर्ण आशा आहे.
गेल्या काही मोसमात रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅट (फलंदाजीत) सपशेल अपयशी ठरत आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक म्हणाले की, “रोहित शर्मा बॅटने (फलंदाजी) चांगली कामगिरी करू शकत नाही. मात्र, रोहित शर्मा कर्णधार म्हणून महत्त्वाचे योगदान देत आहे. मुंबई इंडियन्स असो की टीम इंडिया, रोहित शर्मा एक अप्रतिम कर्णधार आहे. पण आता आपल्याला भविष्याकडेही बघायचे आहे. त्यामुळे ही एक संधी आहे.”
हार्दिक पांड्या झाला कर्णधार…
रोहित शर्माला गेल्या दोन हंगामात फलंदाजीच्या जोरावर केवळ 600 धावा करता आल्या आहेत. या काळात रोहित शर्माची सरासरी 20 आहे, तर स्ट्राइक रेटही 127 आहे. एवढेच नाही तर 2020 पासून मुंबई इंडियन्स संघाला विजेतेपद मिळवण्यात यश आलेले नाही. प्रशिक्षक बाउचर म्हणाले, “खेळाडू म्हणून आम्हाला रोहित शर्माला फक्त मुंबई इंडियन्ससोबत ठेवायचे आहे. रोहित शर्मा संघात मोलाची भर घालतो. कर्णधारपदाचे दडपण दूर झाल्यानंतर रोहित शर्मा आपली फलंदाजीत आणखी सर्वोत्तम कामगिरी करू शकेल, असे आम्हाला वाटते.”
IPL2024 : रोहित-पांड्याने इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले? जाणून घ्या,व्हायरल दाव्याचे सत्य…
दरम्यान, नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने एक धक्कादायक निर्णय घेत हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) गुजरातकडून मोठ्या रकमेत खरेदी केले. हार्दिक पांड्या हा मुंबईचा भावी कर्णधार असेल असा दावा यापूर्वी केला जात होता. पण याच मोसमात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवण्यात आले.