T20WorldCup – ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक सुरु झाला असून सध्या पात्रता फेरीतील सामने खेळवले आहेत. त्याचबरोबर २२ ऑक्टोबर पासून सुपर-१२ चे सामने खेळायला सुरुवात होईल. भारतीय संघाचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी २३ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. या सामन्याअगोदर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने संघाबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. भारतीय संघाला या स्पर्धेत पाकिस्तान, बांगलादेश आणि साऊथ आफ्रिका या संघासोबत सामने खेळायचे आहेत.
मागील वर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात ( T20WorldCup ) भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला होता. मात्र यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने मागील पराभवातून धडा घेत चांगली रणनीती आखली असल्याचे कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. भारताने २००७ ला खेळला गेलेला पहिलाच टी-२० विश्वचषक आपल्या नावावर केला होता. मात्र त्यांनतर या स्पर्धेत भारताला आपलं वर्चस्व सिद्ध करता आलेलं नाही.
#JhulanGoswami | झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट, ‘ही’ अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित संघाबाबतच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलताना दिसत आहे. टी-२० विश्वचषकात ( T20WorldCup ) भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणे ही अभिमानाची बाब असल्याचे रोहितने म्हटले. त्याचबरोबर, “टी-२० विश्वचषक ही मोठी स्पर्धा असून येथे सर्वच खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असतात. मात्र आम्ही स्पर्धेबाबत जास्त विचार करत नाहीत, आणि हीच गोष्ट आम्हाला रणनीती अंमलात आणण्यास मदत करते.” असेही रोहित म्हणाला.
भारत पाकिस्तान सामना असणार खास
भारत पाकिस्तान सामन्याबाबत रोहित म्हणाला की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच खास असतो. हा सामना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित राहतात. तसेच संपूर्ण देशभरात घरोघरी टीव्हीवरही सामना लोक बघतात. हा सामना नक्कीच भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. भारत आपल्या टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक आहे. आम्हाला स्वतःवर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक दबाव न घेता ही स्पर्धा खेळायची आहे.”
From leading India for the first time in ICC World Cup to the team’s approach in the #T20WorldCup ! 👌 👌
💬 💬 In conversation with #TeamIndia captain @ImRo45!
Full interview 🎥 🔽https://t.co/e2mbadvCnU pic.twitter.com/fKONFhKdga
— BCCI (@BCCI) October 19, 2022
त्याचबरोबर रोहित पुढे म्हणाला की, “भारताला पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक ( T20WorldCup ) जिंकायचा आहे. त्यासाठी आम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत. मात्र सध्या इतका पुढचा विचार करणे चुकीचे आहे. आम्ही ज्या संघासोबत सामना खेळणार आहे त्याबाबत विचार करू आणि त्या मार्गाने तयारी करू. आम्ही एक-एक सामना जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि योग्य पद्धतीने सामने खेळून संघाला विजयी करू.”