Indian Railways: नियम बदलले, आता विनाकारण रेल्वेची साखळी ओढल्यास भरवा लागणार प्रति मिनिट 8000 रुपये दंड, तुरूंगवासही होऊ शकतो

Indian Railways: भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये बोगीची साखळी ओढल्यावर ट्रेन थांबते. पण चेन पुलिंगचे नियम फार कमी लोकांना माहिती आहेत. वास्तविक, कोणत्याही प्रवाशाने विनाकारण किंवा केवळ गंमत म्हणून साखळी ओढली, तर त्या प्रवाशाला दंड आकारला जातो. यासोबतच त्याला तुरुंगात जाण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर चेन पुलिंगचे नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे. रेल्वेने आता आपले नियम बदलले आहेत. आता विनाकारण साखळी खेचल्यास 8 हजार रुपये प्रति मिनिट दंड भरावा लागणार आहे.
रेल्वेने कोणतेही गंभीर कारण नसताना साखळी ओढणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचा नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार दंडाची रक्कम पूर्वी 500 रुपये होती. मात्र आता त्यात ट्रेन थांबवण्याच्या खर्चाचीही भर पडणार आहे. यामुळे विनाकारण ट्रेनची साखळी ओढणे चांगलेच महागात पडणार आहे.
चेन पुलिंगवर प्रति मिनिट 8000 रुपये दंड आकारला जाईल –
विनाकारण चेन पुलिंग केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय आता ट्रेनच्या थांब्याचा खर्चही घेतला जाणार आहे. हे डिटेन्शन चार्ज 8000 रुपये प्रति मिनिट या दराने घेतले जाईल. उदाहरणार्थ, जर ट्रेन 5 मिनिटांसाठी थांबली तर प्रवाशाकडून रु 500+ 8000 X5 = रु 40,500 आकारले जातील. यामध्ये 500 रुपये दंड आणि 40 हजार रुपये डिटेन्शन चार्ज भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन 10 मिनिटे थांबल्यास दंड 80,500 रुपयांपर्यंत वाढू शकतो. भोपाळ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक देवाशिष त्रिपाठी यांनी सांगितले की, पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागात 6 डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात येत आहे.
अलार्म चेन पुलिंग या दोन कारणांवर वैध असेल-
भोपाळ विभागानुसार, अलार्म चेन पुलिंग केवळ दोन विशेष परिस्थितीत वैध मानले जाईल. प्रथम, प्रवाशांच्या जीवाला धोका असल्यास अपघात टाळण्यासाठी. दुसरे वैध कारण म्हणजे 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती गाडीत चढायचे राहिल्यास. जसे की तो चढू शकला नाही आणि ट्रेन पुढे गेली. याशिवाय इतर सर्व कारणे बेकायदेशीर मानली जातील.





