आता भारताचा पाकिस्तानवर ‘पाण्याचा प्रहार’ ; चिनाब नदीवरील सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडले

India-Pakistan Water War। भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमध्ये, भारताने आता पाण्यावरून कठोर भूमिका स्वीकारली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरण आणि बागलिहार धरणाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले आहेत, ज्यामुळे पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्यासाठी सलाल आणि बागलिहार धरणांचे दरवाजे बंद केले होते. यामुळे पाकिस्तानमध्ये चिनाब नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली होती. ज्याठिकाणी पूर्वी पाण्याची पातळी २५ ते ३० फूट होती, ती आता फक्त २ ते ३ फूट इतकी कमी झाली आहे, परंतु आता मुसळधार पाऊस आणि जलाशय भरल्यानंतर भारताने दरवाजे उघडले आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पाकिस्तानकडे वाहून जात आहे. India-Pakistan Water War।
#WATCH | Jammu and Kashmir | A gate at the Baglihar Hydroelectric Power Project Dam built on the Chenab River in Ramban has been opened.
(Visuals from the spot shot around 8:15 am) pic.twitter.com/wDsQQqnOzf
— ANI (@ANI) May 9, 2025
भारताच्या या पावलामुळे पाकिस्तानच्या आधीच कमकुवत अर्थव्यवस्थेवर आणि कृषी व्यवस्थेवर आणखी दबाव आला आहे. तज्ज्ञांच्या मते, पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९६० चा सिंधू पाणी करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने लागू करण्यात आला. या करारानुसार, भारताला पूर्वेकडील नद्यांवर (सतलज, रावी, बियास) आणि पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, झेलम, चिनाब) अधिकार मिळाले होते, परंतु पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने हा करार रद्द करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या ९ दहशतवादी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर पाकिस्तान घाबरला आहे. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल सारख्या संघटनांचे अड्डे अचूक हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. यानंतर, पाकिस्तानने पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याच्या तयारीने आणि एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व हल्ले हाणून पाडले. India-Pakistan Water War।





