“पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही…” ; पाकिस्तानी जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पुन्हा ओकली गरळ

India-Pakistan Ceasefire। भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडेच झालेल्या लष्करी संघर्षानंतर, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी, “पाकिस्तान कधीही भारतीय राजवटीसमोर झुकणार नाही आणि आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.’ असे महंत एक प्रकारे भारताला धमकीच दिली आहे.
पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “भारत अमेरिका नाही आणि पाकिस्तान अफगाणिस्तान नाही. भारत इस्रायल नाही आणि पाकिस्तान पॅलेस्टाईन नाही. पाकिस्तानला कधीही थांबवता येणार नाही किंवा सक्ती करता येणार नाही.” पुढे त्यांनी आरोप केला की, “भारतात मुस्लिम आणि शिखांचा छळ केला जात आहे, ज्यामुळे तेथे द्वेष आणि अतिरेकीवाद वाढला आहे.”
शांततापूर्ण चर्चा, पण जोरदार प्रतिसाद India-Pakistan Ceasefire।
भारताने अलिकडेच केलेल्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने परिपक्वता आणि जबाबदारीने प्रतिसाद दिल्याचा दावा केला. मात्र, ते जे म्हणतात ते खोटे आहे. त्यांनी पूंछ आणि सीमेवरील इतर भागांवर अंदाधुंद गोळ्या आणि तोफगोळ्यांचा मारा केला, ज्यामुळे डझनभर निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले.
पाकिस्तानने पुन्हा एकदा मोठे खोटे बोलले India-Pakistan Ceasefire।
डीजी आयएसपीआरच्या म्हणण्यानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढत असताना अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी दावा केला की भारतीय संरक्षण मंत्रालयाने वैयक्तिकरित्या युद्धबंदीची विनंती केली होती. तथापि, पाकिस्तानचे हे विधान देखील खोटे आहे. लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानवर लावलेले आरोप फेटाळून लावले आणि म्हणाले, “भारत कोणत्याही तपासाशिवाय आणि पुराव्याशिवाय आरोप करत आहे. आमच्या सरकारने स्पष्ट केले होते की जर काही पुरावे असतील तर ते शेअर केले पाहिजेत.” तथापि, पाकिस्तान या प्रकरणातही पोकळ दावे करत आहे. पहलगाम हल्ला करणाऱ्या ४ जणांपैकी २ जण पाकिस्तानचे होते, हे आम्ही तुम्हाला सांगतो.
भारताने केले ऑपरेशन ‘सिंदूर,’ पाकिस्तानचे ‘बन्यानाम मार्सो’
पुढे ते म्हणाले की, भारताने ६ ते १० मे दरम्यान पाकिस्तानी लष्करी तळांवर हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने “ऑपरेशन बन्यानम मार्सो” अंतर्गत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आपले सैन्य आणि राष्ट्र एका अटळ भिंतीसारखे उभे आहे, परंतु या संदर्भात पाकिस्तानने अद्याप कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत, तर भारतीय लष्कराने सर्व काही पुरावे सादर केले आहेत.





