एस. जयशंकर यांची अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा, सांगितले- ‘पाकिस्तानला योग्य उत्तर मिळेल’

India -Pak War : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इतर अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, आता पाकिस्तानला योग्य उत्तर दिले जाईल.
आज गुरुवारी रात्री पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, जे भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने हाणून पाडले. काश्मीरपासून राजस्थान आणि पंजाबपर्यंतच्या सीमावर्ती भागात पाकिस्तान गोळीबार आणि हल्ले करत आहे.
जम्मू आणि पठाणकोटवर आत्मघातकी ड्रोनने हल्ला झाला. पाकिस्तानी ड्रोनने जम्मू विमानतळ आणि पठाणकोट हवाई दलाच्या तळाला लक्ष्य केले, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले.
आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. नियंत्रण रेषेजवळील कुपवाडा आणि बारामुल्ला येथे पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार होत आहे, ज्याला भारतीय सैन्य प्रत्युत्तर देत आहे. सतवारी, सांबा, आरएस पुरा सेक्टर आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हे देखील हाणून पाडले.
३ राज्यांमधील ११ शहरांना लक्ष्य करण्यात आले
जम्मू आणि काश्मीर: जम्मू, सांबा, केरन, तंगधर, कर्नाह, अखनूर, आरएस पुरा सेक्टर, अरनिया पंजाब: पठाणकोट राजस्थान: जैसलमेर, पोखरण
या भागात संपूर्ण ब्लॅकआउट जम्मू आणि काश्मीर: जम्मू, किश्तवार, अखनूर आणि सांबा राजस्थान: बारमेर, बिकानेर आणि श्रीगंगानगर पंजाब: चंदीगड जालंधर, अमृतसर आणि पठाणकोट गुजरात: भुज, कच्छ


