India Alliance Updates – लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून देशभरातील राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. अशातच आम आदमी पक्षाने आज आसाममधील लोकसभेच्या १४ जागांपैकी ३ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी गुरुवारी याबाबत पत्रकार परिषद घेत घोषणा केली. दिब्रुगड येथून मनोज धनोहर, गुवाहाटी येथून भावेन चौधरी आणि सोनितपूर येथून ऋषी राज यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
इंडिया आघाडीतर्फे आम्हाला या जागांवर लढण्याची परवानगी देण्यात येईल, अशी अपेक्षाही आम आदमी पक्षातर्फे यावेळी व्यक्त करण्यात आली.
“आम्ही एका परिपक्व आणि समंजस युतीचे भागीदार आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भारत ब्लॉक आमचा निर्णय स्वीकारेल. निवडणूक जिंकणे सर्वात महत्त्वाचे असून या तीन जागांसाठी आम्ही लगेच तयारी सुरू करत आहोत.” असे पथक यांनी स्पष्ट केले.
आपने उमेदवार दिलेल्या ‘त्या’ ३ जागा कोणाकडे? | India Alliance Updates
आसाममध्ये लोकसभेच्या १४ जागा आहेत. यापैकी भारतीय जनता पक्षाकडे ९ जागा, काँग्रेसकडे ३ जागा तर एआययूडीएफ व आयएनडीकडे प्रत्येकी १ जागा आहे.
आम आदमी पक्षाने दिब्रुगड, गुवाहाटी व सोनितपूर येथून उमेदवार दिले आहेत. या तिन्ही जागांवर विद्यमान खासदार भाजपचे आहेत. सोनितपूर मतदारसंघ हा पुनःरचनेपूर्वी तेजपूर लोकसभा मतदारसंघाच्या नावाने ओळखला जायला.
इंडिया आघाडीत समन्वय नाही | India Alliance Updates
आज आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेत गुरुवारी परस्पर तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. यावरून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आपापसात समन्वय नसल्याचेच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.
इंडिया आघाडीकडून याबाबत काय प्रतिक्रिया देण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
राहुल गांधींचं वादग्रस्त विधान म्हणाले,’PM मोदी OBC म्हणून जन्माला आलेले नाहीत, ते तर…”