IND vs ENG 1st Test Day 4,Live Cricket Score (Eng 2nd Inning) : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हैदराबाद कसोटीचा आज चौथा दिवस आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
इंग्लंडचा दुसरा डाव 420 धावांवर आटोपला. अशा प्रकारे ब्रिटीशांना 230 धावांची आघाडी मिळाली. मात्र, हैदराबाद कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला 231 धावा कराव्या लागणार आहेत. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ओली पोपने शानदार खेळी केली. या युवा फलंदाजाने 278 चेंडूत 196 धावा केल्या, पण त्याचे द्विशतक हुकले. त्याने आपल्या खेळीत 21 चौकार मारले. ऑली पोपशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला पन्नास धावांचा टप्पाही स्पर्श करता आला नाही, मात्र पोपच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतासाठी हे लक्ष्य सोपे नसेल. सामन्याच्या चौथ्या डावात विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.
Ollie Pope’s incredible innings of 196 has helped England set a competitive target for the hosts 👊
Can India chase this down?#WTC25 | #INDvENG: https://t.co/E53vcqjfHE pic.twitter.com/up0AjxmDCL
— ICC (@ICC) January 28, 2024
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात पोपच्या 196 धावाव्यतिरिक्त बेन डकेटने 47 धावांचे, टॉम हार्टलेने 34, बेन फॉक्सने 34, जॅक क्रॉलीने 31 आणि रेहान अहमदने 28 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. जसप्रीत बुमराहने 4 इंग्लिश फलंदाजांना आपले बळी बनवले. याशिवाय रवी अश्विनने 3 बळी घेतले. रवींद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलला 1 यश मिळाले.
हैदराबाद कसोटीत आतापर्यंत काय झाले….
इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावांची खेळी खेळली. तर भारतीय संघाकडून रवी अश्विन आणि रवींद्र जडेजाने 3-3 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. इंग्लंडच्या 246 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने 436 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 87 धावा केल्या. केएल राहुलने 86 धावांचे योगदान दिले. यशस्वी जैस्वालने 80 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाकडे 190 धावांची भक्कम आघाडी होती. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने दुसऱ्या डावात 420 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघाला कसोटी जिंकण्यासाठी 231 धावांची गरज आहे.