“महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मान

Eknath Shinde | जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा सन्मान देहू संस्थानचे विश्वत यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. शूर वीरांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हा एकनाथ शिंदेंचा शब्द असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरस्कार स्विकारल्यानंतर म्हणाले. धर्माचे रक्षण करणं जस आपलं कर्तव्य आहे. तसेच नद्या प्रदूषण मुक्त करण आपलं काम आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना नागरिकांना केले. हा पुरस्कार दिल्यामुळे शिंदे यांनी ट्रस्ट आणि वारकऱ्यांचे विशेष आभार यावेळी मानले.
संत तुकोबांच्या रचना आपल्या जगण्यावर भाष्य करतात. ३७५ वर्षानंतर ही त्या काल बाह्य झालेल्या नाहीत. पुढील ३७५ वर्ष च नव्हे तर ३,३७५ वर्ष या रंचनांमधील मधील अर्थ लोप पावणार नाहीत. तुकोबांनी चारशे वर्षांपूर्वी क्लिष्ट अस तत्वज्ञान हे सोप्या मराठीत सांगितलं. हाच मराठीचा अभिजात दर्जा होता, असे मत शिंदेंनी यावेळी व्यक्त केले. तुकाराम महाराजांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही शांततेने काम करत आहोत. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय काय केलं हे सर्वांना परिचित आहे. ते माझं कर्तव्य होत. वारकऱ्यांपेक्षा कुणी मोठं नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
वाकऱ्यासांठी केलेल्या कामाचा सन्मान
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूर वारीसाठी वाकऱ्यांसाठी मोठे अर्थसहाय्य केले होते. वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी विशेष प्रयत्न त्यांनी घेतले, ‘निर्मल वारी, हरित वारी’ तसेच पालखी सोहळ्यातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिमा आणि इतर सेवा सुविधांसाठी त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्याचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार, चिपळ्या, संत तुकाराम महाराज मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. हा सन्मान २५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता.





