नवी दिल्ली – भारताला पुढील विश्वकरंडक स्पर्धा जिंकायची असेल तर आतापासूनच त्याची योजना तयार केली गेली पाहीजे व त्यासाठी जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संघात स्थान दिले पाहीजे, असे परखड मत भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली जेव्हा भारतीय संघाने टी-20 विश्वकरंडक जिंकला होता त्यावेळी संघात जवळपास 90 टक्के खेळाडू नवोदित होते. तरीही त्यांनी कोणतेही दडपण न घेता खेळ केला व करंडक जिंकला. मग असेच पुन्हा घडू शकते केवळ बीसीसीआयने व निवड समितीने युवा खेळाडूंच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला पाहीजे, असे सेहवाग म्हणाला.
विश्वकरंडक स्पर्धेत यंदा जो भारतीय संघ खेळला त्यात अनेक खेळाडू सातत्याने अपयशी ठरत होते. सलामीला, मधल्या फळीत तसेच पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर येऊन डाव सावरणारा अष्टपैलुच संघात नव्हता. हार्दिक पंड्या हा एकमेक अष्टपैलू होता व त्याने त्याच्या क्षमतेनुसार कामगिरीही केली मात्र, ती पुरेशी नव्हती. येत्या काळात किमान टी-20 संघात जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू असले पाहीजेत. भारताकडे युवा खेळाडूंची संख्या मोठी आहे, त्यातील खेळाडूंना सातत्याने विविध मालिकांमध्ये संधी दीली गेली तर त्यांना अनुभवही मिळेल व भारतीय संघ विश्वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही यशस्वी ठरेल. जे 2007 साली घडले ते सातत्याने घडेल फक्त त्यांच्यावर विश्वास दाखवला गेला पाहिजे, असेही सेहवाग म्हणाला.
#IITF2022 : 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र असणार ‘भागीदार राज्य’
वरिष्ठांना विश्रांती द्या
टी-20 क्रिकेट हे वेगवान क्रिकेट आहे, त्यात जे खेळाडू पस्तीशीच्या जवळ पोहोचले आहेत, त्यांनाच वारंवार खेळवत राहण्यापेक्षा त्यांना अशा प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती दिली गेली पाहिजे. जर तेच खेळाडू कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 संघात असतील तर नव्या खेळाडूंना संधी कधी मिळेल, असा सवालही सेहवागने केला आहे.