Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली आहे. त्यानंतर त्यांनी समाजाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केले आहे. तुम्हाला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो,’ असे आव्हान जरांगे यांनी दिले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. यात एकनाथ शिंदेचे माणसे आणि अजित दादांचे देखील दोन आमदार आहेत. त्याचा काही तरी गेम करावा लागेल किंवा याचे एन्काऊंटर करावे लागेल, असे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे. तुम्हाला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचा तरी डाव असून यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. हे मी स्पष्ट सांगतो. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे,” असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, “माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी शोधल्या जात आहेत. संपूर्ण राज्यात माझ्या विरोधात छेडछाड, विनयभंगबाबत एकही तक्रार असल्यास जे सांगाल ते करायला तयार आहे. एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात तुम्ही हात घालू शकत नाही. फडणवीस तुम्ही माझा बळी घेणार असेल तर उपोषण करून मरण्यापेक्षा तुमच्या दारात मरतो.”
कोणत्याही पक्षाचा नाही – मनोज जरांगे
“बारस्कर हा फडणवीस यांनीच उभा केला आहे. मीडियावर दबाव टाकला जात आहे. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे. गुलाल उधळला नाही, त्यामुळे यांचा अपमान आहे. त्यांच्या डोक्यात मी ब्राम्हण त्या मराठ्यांना हरवुन दाखवू, असे आहे. ज्याचे ऐकले नाही त्याला संपवतो. छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही,” असे