WTC 2025-27 Schedule : आगामी डब्ल्यूटीसी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! टीम इंडिया ‘या’ ६ संघांसोबत खेळणार १८ सामने

WTC 2025-27 Schedule Announced : आयसीसीने डब्ल्यूटीसी २०२५-२७ च्या चौथ्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या पर्वात भारतीय क्रिकेट संघ एकूण १८ कसोटी सामने खेळणार असून, यामध्ये सहा मालिकांचा समावेश आहे. यापैकी तीन मालिका भारतात, तर तीन मालिका परदेशात खेळल्या जाणार आहेत. भारतीय संघाची मोहीम २० जून २०२५ पासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेने सुरू होईल, जी परदेशात खेळली जाईल. ही मालिका भारतीय संघासाठी मोठी आव्हानात्मक असेल, कारण इंग्लंडची खेळपट्टी आणि वातावरण भारतीय खेळाडूंसाठी कठीण मानले जाते.
यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका होईल. नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल, जिथे दोन कसोटी सामने खेळले जातील. २०२६ मध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी परदेश दौऱ्यावर जाईल. त्यानंतर २०२६ च्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध भारतात दोन कसोटी सामने खेळले जातील. शेवटी, २०२६-२७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची मालिका परदेशात होईल, जी डब्ल्यूटीसीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरेल.
भारत विरुद्ध इंग्लंड (परदेशात, ५ कसोटी सामने) मालिका:
- पहिली कसोटी: २०-२४ जून, हेडिंग्ले, लीड्स
- दुसरा कसोटी: २-६जुलै, एजबेस्टन, बर्मिंगहॅम
- तिसरा कसोटी: १०-१४ जुलै, लॉर्ड्स, लंडन
- चौथा कसोटी: २३-२७ जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड, मॅनचेस्टर
- पाचवा कसोटी: ३१ जुलै-४ ऑगस्ट, द ओव्हल, लंडन
हेही वाचा – WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण; तब्बल १५ वर्षांनंतर फायनलमध्ये चारली धूळ
-
पहिली कसोटी: २ ऑक्टोबर, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
-
दुसरी कसोटी: १०ऑक्टोबर, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
काही मालिकेंचे वेळापत्रक जाहीर होणे बाकी –
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मायदेशातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तसेच परदेशातील श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळपत्रक आणि स्थळांची अधिकृत घोषणा बाकी आहे.
हेही वाचा – WTC Final 2025 : विजयानंतर बावुमाच्या आनंदाला उरला नाही पारावार, ‘टेम्बा’ मिरवतानाचा VIDEO व्हायरल
या मालिकांमध्ये भारताला शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळण्याची शक्यता आहे. डब्ल्यूटीसीच्या या पर्वात प्रत्येक संघाला सहा मालिका खेळायच्या असून, अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. डब्ल्यूटीसी २०२५-२७ चा अंतिम सामना जून २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने मागील पर्वात चांगली कामगिरी केली होती, परंतु अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. यंदा भारताचा संघ नव्या जोमाने आणि रणनीतीसह मैदानात उतरेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.





