Preity Zinta : ‘मी माझे १०० टक्के दिले, पण…’; ‘बंटवारा १९४७’ फ्लॉप ठरल्यानंतर प्रीती झिंटा स्पष्टच बोलली
Preity Zinta : आता चित्रपटाच्या अपयशावर प्रीती झिंटाने मौन सोडले असून, तिने ‘बंटवारा १९४७’बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Preity Zinta : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बंटवारा १९४७’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. आता चित्रपटाच्या अपयशावर प्रीती झिंटाने मौन सोडले असून, तिने ‘बंटवारा १९४७’बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Preity Zinta)
प्रीती झिंटाने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवर भाष्य केले. ती म्हणाली की, “सर्वप्रथम मला हे सांगायला आवडेल की मला या चित्रपटाचा खूप अभिमान आहे. हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. एक कलाकार म्हणून मी नेहमीच प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.” (Preity Zinta )
पुढे आपल्या कामाविषयी बोलताना प्रीती म्हणाली, “जेव्हा मी एखाद्या चित्रपटात काम करते, तेव्हा मी माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करते. माझा कर्मावर विश्वास आहे. तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा आणि बाकी सर्व देवावर सोडून द्या. पुढे काय होणार आहे, यावर तुमचे नियंत्रण नसते. त्यामुळे प्रत्येक चित्रपटात मी माझ्या परीने शक्य तितके प्रयत्न करते. मी माझे १००० टक्के देते आणि त्यानंतर काय होईल, हे देवावर सोडून देते.”
‘बंटवारा १९४७’चे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले असून, आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मोठी स्टारकास्ट आणि दमदार टीम असूनही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची ‘अवारापन २’सोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती.
प्रीती झिंटाचा आगामी चित्रपट कोणता? (Preity Zinta)
दरम्यान, प्रीती झिंटा लवकरच ‘व्हाइब’ या कॉमेडी-ड्रामा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता कुणाल खेमूसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘व्हाइब’ हा चित्रपट १८ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Sanjay Raut: “सरकारला मनोज जरांगे यांना मारायचंय, त्यांचा उपयोग संपला”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा






