‘हेरा-फेरी’ पिक्चरमध्ये वाजणाऱ्या फोनची थिम दिग्दर्शकाला कशी सुचली? परेश रावल यांनी सांगितला तो किस्सा…

Hera Pheri Movie : बॅालीवूड सिनेसृष्टीतील आयकॅानिक ठरलेल्या हिरा फिरी या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांनी कॅामेडीचा एक नवा ट्रेन्ड सेट करत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या चित्रपटाच्या दोन्ही भागांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या मेकिंगमागे अनेक किस्से आहेत. असाच एक किस्सा अभिनेते परेश रावल यांनी सांगितला आहे.
या चित्रपटातील बाबुराव (परेश रावल) यांच्या घरच्या फोनची रिंग वाजते आणि त्यानंतर चित्रपट कलाटणी घेत पुढे सरकत जातो. पण फोन रिंगची कन्स्पेट प्रियदर्शक प्रियदर्शन यांना कशी सुचली याबाबत अभिनेते परेश रावल यांनी एका वाहिन्याला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.
दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अभिनेते परेश रावल यांना हेरा फिरी चित्रपटाची स्टोरी म्हणजेच स्क्रिप्ट ऐकवली. ते राहत असलेल्या हॅाटेलच्या रुममध्ये त्यांनी स्टोरी ऐकवायला सुरूवात केली. मी त्यांना थांबवलं असल्याची आठवण परेश रावल यांनी सांगितली. त्यामागे एक कारण होतं असे देखील ते म्हणाले.
१९८४ च्या काळात एक नाटक आलं होतं. त्या नाटकाचे नाव होते ‘खेल’. हे एक हिंदी नाटक होतं. त्यामध्ये अभिनेत्री स्वरूप हिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. त्या नाटकाची कहाणी अशी आहे की, एक कलाकार आहे त्याचा आत्मविश्वासा डळमळित झाला आहे. यावरून तो सतत विचारात मग्न असतो. त्याला गर्लफ्रेन्ड देखील आहे. दोघांमध्ये लग्न करण्यावरून सतत भांडण होत असतात. एक दिवस असच दोघांमध्ये वाद सुरू असताना घरात फोनची रिंग वाजते.
…अन् गेम सुरू होतो
ती फोन उचलते आणि समोरची व्यक्ती म्हणते,” तेरी बेटी को काट कर रख देंगे अगर पाच लाख रुपये नही दिये तो” यानंतर फोन ठेवला जातो. त्यानंतर पुन्हा एकदा फोनची रिंग वाजते…फोनवरची व्यक्ती म्हणते क्यों फोन काट दिया, पुढे ती व्यक्ती म्हणते “देख तू समझेगी तो माँ है तू पाच लाख रुपये दे नही तो तेरी बेटी को मार डालेंगे…” ती फोन ठेऊन देते. बाथरुमधून तो बाहेर येतो. हे सारं त्याने एकलेलं असतं. तो एक शक्कल लढवतो आणि म्हणतो यालाच आपण दहा लाख रुपये मागू… यानंतर खऱ्या अर्थाने गेम सुरू होते.
सायरन वाजतो आणि…
तो वेगवेगळे गेटअप करून मुलीला वाचवतो. पैसै पण परत येतात… मात्र ज्या दिवशी पैसे परत घ्यायचे असतात, त्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होतं. तो घरी येतो, ती घरी नसते… त्याला वाटत की ती पैसे घेऊन पळून गेली. त्यानंतर तो पोलिसांना फोन करतो. आणि सर्वकाही सांगतो…. ज्या चोरीला तुम्ही शोधत आहात ती एक गाडीतून पळून गेली असल्याचे तो पोलिसांना सांगतो. यानंतर काही वेळातच दारावरची डोअर बेल वाजतो… तो दरवाजा उघडतो… समोर त्याची गर्लफेन्ड फ्लॅाअर घेऊन उभी असते. त्यानंतर सायरन वाजतो आणि त्या नाटकाचा शेवट होतो, अशी सर्वसाधरण कथा त्या नाटकाची असते.
बाबुराव हे पात्र वर्क केलं नाही, तर….
हि स्टोरी परेश रावल दिग्दर्शक प्रियदर्शन यांना सांगतात. त्यानंतर हेरा फेरी चित्रपटात हि कन्सेप्ट अॅट केली जाते आणि त्यादृष्टीने स्टोरी लिहिली जाते. त्यानुसार प्रियदर्शन हेरा फेरीमध्ये त्या फोन रिंगच्या अनुषंगाने स्टोरीत बदल करतात, अशी आठवण परेश रावल यांनी मुलाखती दरम्यान सांगितली आहे. तसेच चित्रपटातील बाबुराव हे पात्र वर्क केलं नाही, तर हा चित्रपट फ्लॅाप होईल, असेही भाकित प्रियदर्शन यांनी वर्तवलं होतं, अशी आठवण त्यांनी सांगितली. पण तसं काही न होता बाबुराव हिट झाला आणि चित्रपटही….





