Himanta Biswa Sarma : प्रशासनात शिस्त आणि व्यावसायिकता आणा; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे निर्देश
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी राज्यातील सर्व जिल्हा आयुक्तांना वसाहतवादी प्रशासकीय मानसिकता सोडून सार्वजनिक सेवेत शिस्त, कार्यक्षमता आणि खासगी क्षेत्रातील व्यावसायिकता आणण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी राज्यातील सर्व जिल्हा आयुक्तांना वसाहतवादी प्रशासकीय मानसिकता सोडून सार्वजनिक सेवेत शिस्त, कार्यक्षमता आणि खासगी क्षेत्रातील व्यावसायिकता आणण्याचे कडक निर्देश दिले आहेत. जोरहाट येथे पार पडलेल्या दोन दिवसीय जिल्हा आयुक्त परिषदेत त्यांनी हे निर्देश दिले.
सोमवारी मध्यरात्रीनंतर संपलेल्या या दोन दिवसीय परिषदेत मंत्री, जिल्हा आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १५ विभागांवर तब्बल २७ तास सखोल चर्चा करण्यात आली. प्रशासनावर असलेला वसाहतवादी मानसिकतेचा प्रभाव झटकून टाकत अधिकाऱ्यांनी खासगी क्षेत्रासारखी कार्यक्षमता आणि शिस्त बाळगली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी (Himanta Biswa Sarma) स्पष्ट केले.
दैनंदिन प्रशासनात तंत्रज्ञान आणि एआयचा प्रभावी वापर करणे आता अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा आयुक्तांनी आपापल्या विभागांसोबत बैठका घेऊन शासनाचे प्रत्येक निर्देश कुठलाही विलंब न लावता थेट तळागाळातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहचतील आणि त्याची अंमलबजावणी होईल, याची खात्री करावी.
आसामच्या प्रत्येक जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करावी आणि आपल्या जिल्ह्याला देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी व्यक्त केली.
या परिषदेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय कामांचा वेग कायम राखत ८५ हून अधिक फाईल्स निकाली काढल्या आणि ३४ हून अधिक पत्रे व नोट्स लिहिल्या. या सर्व चर्चेमुळे तळागाळात प्रत्यक्ष आणि सकारात्मक बदल दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






