Harshwardhan Sapkal : राजीनामा हे केवळ पहिले पाऊल, न्यायासाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहणार; सपकाळ यांनी व्यक्त केले मत
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे केवळ पहिले पाऊल आहे. पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईपर्यंत पक्षाचा लढा सुरूच राहील, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी शनिवारी सांगितले.

Harshwardhan Sapkal : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे केवळ पहिले पाऊल आहे. पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईपर्यंत पक्षाचा लढा सुरूच राहील, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी शनिवारी सांगितले.
सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले, प्रधान यांच्या राजीनाम्याकडे लोकशाहीचा विजय म्हणून पाहणे घाईचे ठरेल. गेल्या दशकात वारंवार घडलेल्या पेपर फुटीच्या घटनांमुळे गुणवत्तेला धक्का लागला आहे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळाले आहे आणि लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.
केवळ राजीनामा दिल्याने गैरकृत्य पुसले जात नाही. पेपर फुटीच्या प्रकरणांमागील सूत्रधार आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सर्वांची ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी नीट पेपरफुटी आणि इतर परीक्षांच्या पेपर फुटीच्या प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली. प्रधान आणि इतर जबाबदार व्यक्तींना कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे आणि त्यांना (Harshwardhan Sapkal) जबाबदार धरले पाहिजे.
देशभरातील लाखो गुणवान आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आपला लढा सुरूच ठेवेल, असे सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले. प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
राज्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, पक्षाने नीट पेपर फुटल्याप्रकरणी देशभरात आंदोलन केले होते आणि नंतर विद्यार्थी चळवळीने या आंदोलनाला वेगळी दिशा दिली. लोकशाहीच्या रक्षणासाठी लढण्याच्या निर्धाराबद्दल युवाशक्ती आणि त्यांच्या एकजुटीचे कौतुक केले पाहिजे, असे ते म्हणाले.






