Harshwardhan Sapkal : सत्तेवर मुके, बहिरे आणि आंधळे सरकार; ब्रिज भूषण यांच्या निर्दोष मुक्ततेवरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
ब्रिज भूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Harshwardhan Sapkal : लैंगिक छळाच्या प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिज भूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुके, बहिरे आणि आंधळे सरकार असताना ही देशाची दुर्दैवी स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी या निर्णयाच्या वेळेवर बोट ठेवले. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा सन्मान वाढवणाऱ्या खेळाडूंचाच अवमान झाल्याची विडंबना त्यांनी अधोरेखित केली.
सपकाळ म्हणाले, देशातील कायदा आंधळा (अंधा कानून) आहे. या महिलांनी देशाचा सन्मान वाढवला आहे, त्या खऱ्या अर्थाने देशाचा अभिमान आणि प्रतिष्ठा आहेत. सिंह यांच्यासारख्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी होती. पण हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की सत्तेवर मुके, बहिरे आणि आंधळे सरकार आहे.
भाजपचा एखादा कार्यकर्ता, नेता किंवा व्यक्ती काहीही कृत्य करो, अगदी बलात्काराइतका गंभीर गुन्हाही केला, तरीही त्यांची निर्दोष मुक्तता होऊ शकते, हा निर्णय कुठेतरी तोच संदेश देत असल्याचे दिसते, असा दावा त्यांनी केला.
भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा दुर्दैवाने आपल्या सर्वांसमोर आला आहे. हा चेहरा उघड झाला असला तरी, महिलांना मिळायला हवा असलेला सन्मान, देशाची प्रतिष्ठा आणि खेळाडूंबद्दल असायचा आदर हे सर्व खूपच खालावले आहे. या देशाचा नागरिक म्हणून मी त्यांची माफी मागतो की, हा देश त्यांना न्याय देऊ शकला नाही. परंतु भविष्यात सत्ता बदलल्यावर अशा लोकांना कठोरतम शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
पण ज्यांनी त्या सन्मानावर घाला घातला, त्यालाच निर्दोष मुक्ततेचे पदक दिले गेले, त्याच्या गळ्यात सुवर्णपदक घातले गेले. मोदीजी, हा देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असेही सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले.






