Harshvardhan Sapkal : वंदे मातरमवरून धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न; भाजपकडे इतर कोणतेही मुद्दे नाहीत : सपकाळ
Harshvardhan Sapkal : भारतीय जनता पक्षाकडे (BJP) जनतेला सांगण्यासारखे कोणतेही ठोस विकासाचे मुद्दे शिल्लक उरलेले नाहीत.

Harshvardhan Sapkal : भाजपकडे चर्चा करण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे नसल्यामुळेच ते वंदे मातरमचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी केला. (Harshvardhan Sapkal)
एका कार्यक्रमात बोलताना सपकाळ म्हणाले, देशातील राजकीय वातावरण बदलले आहे आणि लोक आता भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला जाब विचारत आहेत. भाजप सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीही नाही, म्हणूनच ते हिंदू-मुस्लिम फूट निर्माण करण्याचा कट रचत आहेत. (Harshvardhan Sapkal)
वंदे मातरमवरून निर्माण केल्या जाणाऱ्या वादाला बळी पडू नका. काँग्रेस सूडाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. मोहब्बत की दुकान हाच पक्षाचा मार्ग आहे. (Harshvardhan Sapkal)
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्यादरम्यान वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला होता आणि किती कडवी गायली जावीत, याचे निर्णय महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले होते. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही, त्यांनी काँग्रेसला देशभक्ती शिकवण्याची गरज नाही, असे सपकाळ म्हणाले. (Harshvardhan Sapkal)
राहुल गांधींना रोखण्याचा प्रयत्न
काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आणि खासदार इम्रान प्रतापगढी यांनी आरोप केला की, भाजप सरकार २२ ऑगस्ट रोजी पुण्यात राहुल गांधी यांच्या होणाऱ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमातही अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्यासाठी पुण्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. (Harshvardhan Sapkal)
राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न करण्याची चूक भाजप सरकारने करू नये. कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नाही. देश गेल्या १२ वर्षांपासून एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे, परंतु आता राजकीय वातावरण बदलत आहे. (Harshvardhan Sapkal)
सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी आपल्या मागण्यांसाठी लढा सुरूच ठेवला. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी छात्रों की गूंज ही मोहीम सुरू केली आहे, असे प्रतापगढी म्हणाले. (Harshvardhan Sapkal)





