‘जोधा-अकबरच्या विवाहाची गोष्ट खोटी, ‘अकबरनाम्या’त कुठेही उल्लेख नाही ..’ ; राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा दावा

Haribhau Bagde on Akbar। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी,”ब्रिटिश इतिहासकारांच्या सुरुवातीच्या प्रभावामुळे भारताच्या इतिहासात अनेक चुका नोंदवल्या गेल्या, ज्यामध्ये जोधाबाई आणि मुघल सम्राट अकबर यांच्या लग्नाची कहाणी देखील समाविष्ट आहे असा दावा केला आहे. उदयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना बागडे यांनी, अकबरनाम्यात जोधा आणि अकबरच्या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही” असा मोठा दावा त्यांनी केला आहे.
अकबराचा विवाह एका दासीच्या मुलीशी झाला Haribhau Bagde on Akbar।
हरिभाऊ बागडे यांनी कार्यक्रमात बोलताना, “असे म्हटले जाते की जोधा आणि अकबर यांचे लग्न झाले होते आणि या कथेवर एक चित्रपटही बनवण्यात आला होता. इतिहासाची पुस्तकेही असेच सांगतात, पण हे खोटे आहे. भारमल नावाचा एक राजा होता आणि त्याने एका दासीच्या मुलीचे लग्न अकबराशी लावून दिले.” असा दावा त्यांनी केला आहे.
राज्यपालांच्या विधानामुळे १५६९ मध्ये अकबर आणि आमेर शासक भारमलच्या मुलीच्या लग्नाच्या ऐतिहासिक तथ्यांवर वादविवाद पुन्हा सुरू झाला आहे. आमेर किंवा अंबर हे जयपूरजवळील एक राजपूत राज्य होते आणि १७२७ मध्ये सवाई जयसिंग द्वितीय यांनी जयपूरला राजधानी हस्तांतरित करण्यापूर्वी कचवाहा राजपूतांनी त्यावर राज्य केले होते.
कार्यक्रमात बागडे यांनी, “ब्रिटिशांनी आपल्या वीरांचा इतिहास बदलला. त्यांनी तो योग्यरित्या लिहिला नाही आणि सुरुवातीला त्यांच्या इतिहासाची आवृत्ती स्वीकारली गेली. नंतर, काही भारतीयांनी इतिहास लिहिला पण तरीही तो ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होता.”असे म्हटले आहे.
‘महाराणा प्रताप बद्दल कमी शिकवले गेले…’ Haribhau Bagde on Akbar।
राजपूत शासक महाराणा प्रताप यांनी अकबराला तह लिहिला होता या ऐतिहासिक दाव्याचेही राज्यपालांनी खंडन केले. त्यांनी ते पूर्णपणे दिशाभूल करणारे म्हटले. हरिभाऊ बागडे यांनी दावा केला की, “महाराणा प्रताप यांनी कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. इतिहासात अकबराबद्दल जास्त आणि महाराणा प्रतापांबद्दल कमी शिकवले जाते.मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. असे त्यांनी सांगतिले. ते म्हणाले की, “नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात, आपली संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपून भविष्यातील आव्हानांसाठी नवीन पिढीला तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
हरिभाऊ बागडे यांनी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव करत त्यांना देशभक्तीचे प्रतीक म्हटले. ते म्हणाले, “त्यांच्या जन्मात ९० वर्षांचा फरक आहे. जर ते समकालीन असते तर देशाचा इतिहास वेगळा असता. दोघांनाही शौर्य आणि देशभक्तीच्या एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाते.”





