‘ते पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरच तोंड उघडतात’ ; बांगलादेशातील हिंसाचारावर ओवेसींचे मौन, गिरीराज सिंह यांची टीका

Giriraj Singh Attack Asaduddin Owaisi । केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांनी बांगलादेश हिंसाचारावर विरोधकांच्या मौनाचा समाचार घेतला आहे. या मुद्द्यावर त्यांनी केवळ इंडिया अलायन्सच्या बड्या नेत्यांवरच नव्हे तर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही हल्ला चढवला.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना गिरीराज सिंह बांगलादेशातील हिंसाचारावर बोलताना, “बांगलादेशात ज्या प्रकारे हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते पाहून भारत सरकारनेही त्यांना फटकारले आहे, आता लोकांनीही यात हस्तक्षेप करायला हवा.असे मला वाटते.” असे म्हणाले.
‘ते पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरच तोंड उघडतात’ Giriraj Singh Attack Asaduddin Owaisi ।
भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह इथेच थांबले नाहीत. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा उल्लेख करत त्यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, ओवेसी अशी व्यक्ती आहे जी राष्ट्रगीताच्या वेळी सभागृहात उपस्थित नसते. तो संविधानविरोधी आहे. बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत, पण ते या मुद्द्यावर एकदाही तोंड उघडत नाहीत. पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरच त्यांची जीभ उघडी होती.
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावरही प्रश्न उपस्थित Giriraj Singh Attack Asaduddin Owaisi ।
आपल्या वक्तव्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “ना राहुल गांधी बांगलादेशच्या मुद्द्यावर काहीही बोलत नाहीत आणि अखिलेश यादव कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीत. ही तुकडे-तुकडे टोळी बांगलादेशच्या मुद्द्यावर कधीच बोलत नाही.”
आंतरराष्ट्रीय समुदायाला ‘हे’ आवाहन
गिरीराज सिंह यांनी बांगलादेश हिंसाचारावर आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढे येऊन बोलण्याचे आवाहनही केले आहे. ते म्हणाले, “बांगलादेशात आता कट्टरतावादी वर्चस्व गाजवत आहेत. त्याठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत आहेत. कायदेशीर मार्गानेही त्यांना भारतात येण्याची परवानगी दिली जात नाही. हिंदू संतांना तुरुंगात टाकले आहे. ते लोक तिथे कोणत्या स्थितीत राहतात माहीत नाही. आता वेळ आली आहे की जगातील लोकांनी बांगलादेशातही हस्तक्षेप केला पाहिजे.





