Doda Ganesh Trolls AB : “भावा गांजा सोड आता!”; विराट-सचिनच्या तुलनेवरून एबी डिव्हिलियर्सवर भडकला माजी भारतीय गोलंदाजज
Doda Ganesh Trolls AB : भारताचा माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेशने विराट-सचिनच्या तुलनेवरुन एबी डिव्हिलियर्सची जोरदार खिल्ली उडवली आहे.

Doda Ganesh Trolls AB de Villiers Viral Ganja Post Over Virat Sachin Comparison In Overseas Tests : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) परदेशी मैदानांवर विराट कोहली हा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरपेक्षा (Sachin Tendulkar) सरस फलंदाज असल्याचे विधान केले होते. मात्र, डिव्हिलियर्सचा हा दावा भारतीय क्रिकेट जगताच्या पचनी पडलेला नाही. भारताचा माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेशने (Doda Ganesh) या विधानावरून एबी डिव्हिलियर्सची जोरदार खिल्ली उडवत त्याला थेट “भावा, गांजा सोड!” (Bhai Ganja Chhod De) असा टोला लगावला आहे. डोडा गणेशच्या या एका कमेंटने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे.
नेमकं काय म्हणाला होता एबी डिव्हिलियर्स?
एबी डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले होते की, “उसळत्या आणि वेगवान खेळपट्ट्यांवर आशियाई फलंदाज यशस्वी होऊ शकतात हे सचिनने दाखवून दिले खरे; परंतु सचिनपेक्षा विराट कोहली अधिक कणखर आणि श्रेष्ठ फलंदाज ठरला. सचिनने सुरू केलेला हा मार्ग विराटने नव्या उंचीवर नेला.” या विधानामुळे सचिन आणि विराटच्या चाहत्यांमध्ये जोरदार वाद पेटला होता, ज्यात आता माजी भारतीय क्रिकेटपटूंनीही उडी घेतली आहे.
डोडा गणेशचा थेट वार; सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
Pass on the weed, brother. https://t.co/3XOy6o6x9t
— Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ (@doddaganesha) August 20, 2026
डिव्हिलियर्सच्या या विधानावर भारताचे माजी गोलंदाज डोडा गणेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) अत्यंत आक्रमक आणि उपरोधिक शैलीत प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट डिव्हिलियर्सला नशेत असल्यासारखे विधान न करण्याचा सल्ला देत “गांजा सोड” असे सुनावले. गणेश यांच्या या एका वाक्याच्या पोस्टने लाखो क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून डिव्हिलियर्सच्या तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सचिन अन् विराटची कसोटी आकडेवारी काय सांगते?
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आजही २०० सामन्यांत १५,९२१ धावांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका अशा सर्वच देशांत ऐतिहासिक शतके झळकावली असून भारताबाहेर तब्बल ८,७०५ धावा कुटल्या आहेत. तर दुसरीकडे, मे २०२५ मध्ये कसोटीतून निवृत्त झालेल्या विराट कोहलीने १२३ सामन्यांत ९,२३० धावा केल्या आहेत. विराटने २०१८ चा इंग्लंड दौरा (५९३ धावा) आणि २०१४ चा ऑस्ट्रेलिया दौरा (४ शतके) गाजवला असला तरी सचिनच्या कसोटी कारकिर्दीशी त्याची तुलना करणे चुकीचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.





