“मी अशा राज्यातून येते जिथे हिंदी शिकणे गुन्हा आहे…” ; जाणून घ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असे का म्हटले?

Finance Minister Nirmala Sitharaman । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा संसदेतील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या “मी अशा राज्यातून येते जिथे हिंदी शिकणे गुन्हा मानला जातो” असे म्हणताना दिसत आहेत. सध्या त्यांच्या या व्हिडिओची सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून येत आहे.
बँकिंग कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2024 वर लोकसभेत झालेल्या जोरदार चर्चेदरम्यान, निर्मला सीतारामन म्हणाल्या “ते (विरोधक) हिंदीच्या विरोधात आहेत. हिंदी शिकायची इच्छा असून देखीलतामिळनाडूच्या रस्त्यावर माझी खिल्ली उडवली गेली.” असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला अर्थमंत्री उत्तर देत होते. यादरम्यान, सपा सदस्य राजीव रॉय यांनी त्यांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत त्यांनी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांच्या हिंदीवर संदेतील काही सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी सिरतारामन यांनी,”माझी हिंदी भाषा तितकी चांगली नाही. मी हिंदीत फक्त काही शब्द बोलू शकते. मला नक्कीच इतका हिंदी शब्दसंग्रह समजतो की अपशब्द काय आहेत आणि कोणते नाहीत. मी अशा राज्यातून आले आहे जिथे हिंदी शिकणे गुन्हा आहे, त्यामुळे लहानपणापासून मला हिंदी वाचण्यापासून रोखले गेले.” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, तामिळनाडूतील काही द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम) सदस्यांनी अर्थमंत्र्यांच्या विधानाला विरोध केला तेव्हा त्या म्हणाल्या की, जेव्हा मी म्हणते की (तामिळनाडूमध्ये) वातावरण हिंदी शिकण्यासाठी अनुकूल नाही, तेव्हा मी हे माझ्या वैयक्तिक पातळीवरून सांगत आहे. तमिळनाडूचा अनुभव. माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा मी शाळेबाहेर हिंदी शिकले तेव्हा तामिळनाडूच्या रस्त्यावर माझी चेष्टा केली जायची. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.” असे म्हणत त्यांनी द्रमुक यांच्या विरोधाला हाणून पाडले .
‘पंतप्रधानांनी सर्व स्थानिक भाषांचा आदर वाढवला’ Finance Minister Nirmala Sitharaman ।
निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मला एक पंतप्रधान सांगा ज्याने तमिळला संयुक्त राष्ट्रात नेले आहे… नरेंद्र मोदी. मला एक असा पंतप्रधान सांगा जो तामिळ भाषेचा वारंवार उद्धृत करतो. कारण ते त्या भाषेचा आदर करतात. पंतप्रधान मोदींनी तमिळसह सर्व स्थानिक भाषांना प्रोत्साहन दिले आहे.
‘भारताची बँकिंग व्यवस्था व्यावसायिकांच्या हातात’ Finance Minister Nirmala Sitharaman ।
त्या पुढे म्हणाल्या कि, भारताची बँकिंग व्यवस्था व्यावसायिकांच्या हातात आहे. आपली बँकिंग व्यवस्था दूरवर पोहोचत आहे. ग्रामीण भागातही बँकेच्या शाखा आहेत. बँकेच्या एकूण शाखांची संख्या एक लाख ६० हजारांहून अधिक झाली आहे. ग्रामीण भागात पाच किलोमीटरच्या आत बँकेची शाखा किंवा एटीएम किंवा बँक मित्र आहे.
2023-24 मध्ये बँकांनी सर्वाधिक नफा कमावल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका नफ्यात आल्या आहेत. ग्रॉस एनपीए 7.97 वर आला आहे. जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात एमएसएमईसाठी पाच वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. एमएसएमईंना प्लांट आणि मशिनरी कर्ज दिले गेले नाही, ते आम्ही दिले. एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी यांच्यासमवेत क्लस्टर ते क्लस्टर जात आम्ही सांगितले की या पाच योजना आहेत, कृपया या आणि त्यांचा लाभ घ्या.
कोणतीही भाषा शिकण्यापासून थांबवले नाहीः द्रमुक खासदार
तामिळनाडूमध्ये हिंदी लादल्याच्या मुद्द्यावर द्रमुकच्या खासदार कनिमोझी करुणानिधी म्हणाल्या, “तामिळनाडूमध्ये कोणालाही कोणतीही भाषा शिकण्यापासून रोखण्यात आले आहे, असे कधीच घडले नाही. आम्ही फक्त हिंदी लादण्याला विरोध केला होता. विरोध झाला आणि खूप काही झाले. संघर्षामुळे आज केंद्र सरकारच्या शाळांमध्ये तमिळ शिकणे जवळजवळ अशक्य आहे.”





