Farooq Abdullah। येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या संभाव्य बिहार विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेसने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक ७ ऑगस्ट रोजी दिल्लीत होणार आहे,याविषयीची माहिती नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मूमध्ये दिली. तसेच या बैठकीसाठी विरोधी आघाडी ‘इंडिया’च्या सर्व नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. फारुख अब्दुल्ला स्वतःही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. राहुल गांधींच्या ‘अणुबॉम्ब’ दाव्यावर टिप्पणी Farooq Abdullah। फारुख अब्दुल्ला यांनीही राहुल गांधींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “त्यांच्याकडे भाजपच्या ‘मत चोरी’च्या प्रकरणी अणुबॉम्बसारखे पुरावे आहेत. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “राहुल गांधींनी असा दावा केला आहे की त्यांनी अशी व्यवस्था केली आहे की आता ते बिहार निवडणूक जिंकतील. पुढे अब्दुल्ला म्हणाले की,”त्यांना स्वतः या प्रकरणाचे सत्य जाणून घ्यायचे आहे आणि म्हणूनच ते बैठकीला जात आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या राज्याच्या दर्जावर पुन्हा विश्वास अब्दुल्ला यांनी,”जम्मू आणि काश्मीरला निश्चितच त्याचा राज्याचा दर्जा परत मिळेल” असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला. तसेच आम्हाला आमचे हक्क मिळतील असे म्हणत नॅशनल कॉन्फरन्स पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यावर आवाज उठवत आहे आणि हा संघर्ष अजूनही सुरू आहे.” असा दावा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसच्या उपोषणापेक्षा वेगळा का? काँग्रेसने राज्याच्या पुनर्स्थापनेसाठी ९ ते २१ ऑगस्टपर्यंत उपोषणाची घोषणा केली आहे आणि नॅशनल कॉन्फरन्स त्यात सहभागी होणार नाही. याबाबत अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष आधीच लोकांच्या हक्कांसाठी लढत आहे. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा ओमर अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा त्यांनी निश्चितच राज्याचा मुद्दा उपस्थित केला. चर्चा कधीच थांबलेल्या नाहीत. केंद्र सरकारवर व्यंग आणि नाराजी Farooq Abdullah। अब्दुल्ला म्हणाले की, जेव्हा केंद्र सरकार जम्मू-काश्मीरच्या चार रिक्त राज्यसभा आणि दोन विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकाही घेऊ शकत नाही, तेव्हा त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करणे व्यर्थ आहे. त्यांनी भाजपचे विकासाचे दावेही फेटाळून लावले. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली पुढे बोलताना त्यांनी, ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मी शांतता प्रस्थापित केली आहे असे ओरडत राहतात. आज त्यांनी आपल्यावर २५ टक्के कर लादला आहे आणि दंडही लावला आहे. आमच्या विनाशासाठी साहित्य तयार केले जात आहे. आमचे सर्व उद्योगपती पळून जात आहेत. ते दुबईतून काम करतील. आमचे लोक आधीच बेरोजगार आहेत आणि याठिकाणी बेरोजगारी वाढेल.’ तसेच, भारताला आता जागतिक व्यासपीठांवर नुकसान सहन करावे लागेल, तर बांगलादेश आणि कंबोडियासारख्या लहान देशांना फायदा होऊ शकतो.असेही त्यांनी म्हटले. प्रज्ञा ठाकूर यांच्या दाव्यावर मौन मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या दाव्यावर फारूक अब्दुल्ला यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “पंतप्रधानांचे नाव घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. ते म्हणाले की ते आधीच अडचणीत आहेत आणि सध्या काहीही बोलणे योग्य होणार नाही.”