Farmers Protest। आपल्या विविध मागण्यासाठी पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्याने दिल्लीकडे कूच केलीय. त्याच पार्श्वभूमीवर आज बळीराजाने भारत बंदची हाक पुकारली आहे. संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि इतर शेतकरी गटांनी आज देशव्यापी संप पुकारला. त्यामुळे या संपाचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार असल्याचे दिसतंय.
संयुक्त किसान मोर्चाने सर्व समविचारी शेतकरी संघटनांना 16 फेब्रुवारीच्या ‘ग्रामीण भारत बंद’मध्ये एकत्र येण्याचे आवाहन केलंय. ग्रामीण भारत बंद सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत देशभरातील प्रमुख रस्त्यांवर ‘चक्का जाम’मध्ये शेतकरी सहभागी होणार आहेत.
भारत बंदला ‘यांचा’ पाठिंबा Farmers Protest।
ग्रामीण भारत बंदला काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या व्यतिरिक्त, अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक, इतिहासकार इरफान हबीब, आर्थिक इतिहासकार नासिर तैयबजी, सांस्कृतिक कार्यकर्ते अनिल चंद्र आणि पत्रकार पी साईनाथ हे शेतकरी आणि कामगारांच्या बंदला समर्थन दिले. शेतकऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नात आपण सामील असल्याच्या निवेदनावर त्यांनी स्वाक्षरी केली.
बँका, शाळा, कार्यालयेही बंद राहणार का?
आजच्या शेतकरी संघटनांच्या देशव्यापी संपामुळे वाहतूक, खाजगी कार्यालये, गावातील दुकाने आणि ग्रामीण औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील संस्था बंद राहण्याची अपेक्षा आहे. या संपामुळे रस्ते आणि वाहतूक विस्कळीत होणायेर. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. सध्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आलेली नाही.
हेहीवाचा
शेतकऱ्यांकडून आज ‘भारत बंद’ची हाक ; ‘या’ वेळेत राहणार सर्व बंद
भारत बंदमुळे बँका बंद राहतील कि सुरु या बाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे मॅट्रिक्समध्ये बँका खुल्या राहतील असेही म्हटले. यासोबतच संपाच्या काळात आपत्कालीन सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता नाही.