Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या क्रूर हत्येनंतर महाराष्ट्र हादरला. या हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. कराड तुरूंगात असून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जात आहे. या प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. नुकतेच एका कार्यक्रमात सुरेश यांनी एक केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी एका मोठ्या नेत्याची विकेट पाडली, असं सुरेश धस म्हणाले आहेत. चिखलीतील नवसाला पावणारी देवी लक्ष्मी मातेच्या नवसपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमासाठी ते आले होते. या कार्यक्रमाता बोलताना त्यांनी वरील विधान केलं आहे. या कार्यक्रमात त्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी आपल्या मनोगतात हे विधान केलं. नेमकं काय म्हणाले सुरेश धस? नागपूरच्या पहिल्याच आधिवेशात मी संतोष देशमुख यांचा मुद्दा मांडला आणि त्याप्रकरणी न्यायच मिळवून घेतला. यात एका मोठ्या नेत्याची विकेटही त्यात पडली. ते पण क्लीन बोल्ड होण्याची पाळी त्यांच्यावर आली. कारण त्यांचे सहकाऱ्यांनी हा उद्योग केला होता, अशी अप्रत्यक्ष टीका सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे. पुढे ते म्हणाले, आता हे जिंदाबाद ते जिंदाबाद चाललं आहे याच भान जरा राहिले पाहिजे, आपण कोणाचा जिंदाबाद करतोय, हम सब अंगार हे म्हणायचं बाकी भंगार है अशा पद्धतीच्या घोषणा देतात. याला फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा अधिकार आपल्याला आहे का, असा सवालही सुरेश धस यांनी केला. एक लाख ४१ हजार मतदारांनी मला मतदान दिलं, ही माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे. माझा कोणताही कारखाना नाही, संस्था नाही किंवा मी कोणताही सम्राट नाही. पण, जनतेच्या मनावर प्रेम करणारा मी नक्कीच सम्राट आहे, असं धस म्हणाले. छाताड फुगवणारे आणि लॉकेट घालणारे विधानभवनात जास्त काळ टिकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. हेही वाचा : राज्यात पुन्हा कोसळधारा ! पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता,