‘यापूर्वी देखील मंदिराच्या छतामधून पाणी गळती झाली होती…’; मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिली सविस्तर माहिती

Ram Mandir । Ram Mandir Roof Leaking । या वर्षी 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आला. राम मंदिर बांधण्याचे काम आताही सुरूच आहे. अशा स्थितीत पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छतावरून पाणी गळती सुरु झाली आहे.
श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्याचवेळी आता याप्रकरणी श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांचे वक्तव्य समोर आले आहे.
राम मंदिरातील छत गळतीच्या मुद्द्यावर नृपेंद्र मिश्रा म्हणाले…
”मी अयोध्येत आहे. मला पहिल्या मजल्यावरून पावसाचे पाणी पडताना दिसले. गुरु मंडपाच्या वर आकाश आहे आणि ते मोकळे आहे. शीर्ष पूर्ण झाल्यावर ते झाकले जाईल. सध्याच्या परिस्थितीत हे होणे निश्चितच आहे.
नृपेंद्र मिश्रा पुढे म्हणाले की, मला काही ठिकाणी गळतीही दिसली. हा सर्व त्रास पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामामुळे होत आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर ही गळती बंद होईल. गर्भगृहात पाणी गळतीबाबत ते म्हणाले की, गर्भगृहात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे गळती होत आहे.” असं ते म्हणाले.
काय म्हणाले आचार्य सत्येंद्र दास?
अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास म्हणाले होते की, ’जे काही मंदिर बांधले गेले आहे आणि जिथे राम लल्ला बसले आहेत, तिथे पहिल्याच पावसात पाणी टपकायला लागले आहे. गर्भगृहाचा आतील भागही पाण्याने भरला होता. कोणत्या गोष्टींमुळे पाणी टपकत आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. जे बनवले जाते त्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
आज या समस्येवर उपाय काय आहे याचा विचार करा आणि निर्णय घ्या. अन्यथा पाऊस सुरू झाला तर पूजा-दर्शन बंद होईल. ते म्हणाले की, गर्भगृहासमोर जिथे नवीन पुजारी बसतात आणि जिथे व्हीआयपींना भेट देण्याची जागा आहे तिथे सर्वत्र पाणीच पाणी आहे.’
पाणी गळण्याची ही दुसरी वेळ आहे…
सत्येंद्र दास म्हणाले होते की, “मंदिराच्या छतामधून पाणी गळण्याची ही दुसरी वेळ आहे, असा दावा केलाय. पहिल्या पावसातही मंदिराच्या छतामधून गळती झाली होती. त्यावेळी आचार्य सत्येंद्र दास यांनी विरोध केल्यानंतर पाणी काढून टाकण्यात आलं होतं.
राम ललाच्या भव्य मंदिराच्या निर्माण कार्यात देशातील नामवंत इंजिनिअर काम करत आहे. मात्र, तरीही अशी परिस्थिती आहे असं आचार्य सत्येंद्र दास म्हणाले.





