Rohini Khadse : अभिजित दिपकेंसाठी रोहिणी खडसेंची CM फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाल्या – ‘केंद्र सरकारशी चर्चा करून…’
Rohini Khadse : अभिजित दिपके हे ६ जून रोजी भारतात परतणार असून, परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Rohini Khadse : कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके यांच्या भारतात परतल्यानंतर त्यांच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दिपके यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा त्यांनी केला.
अभिजित दिपके हे ६ जून रोजी भारतात परतणार असून, परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित आंदोलनात सहभागी होणार आहेत. (Rohini Khadse )
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिपके यांनी नीट (NEET) परीक्षेतील प्रश्नांवर देशभरातील तरुणांना एकत्र आणून व्यापक जनआंदोलन उभारले होते. या मोहिमेमुळे त्यांना यापूर्वीही विरोधकांकडून धमक्या मिळाल्यात. (Rohini Khadse)

Rohini Khadse : अभिजित दिपकेंसाठी रोहिणी खडसेंची CM फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाल्या – ‘केंद्र सरकारशी चर्चा करून…’
“अभिजित दिपके हे महाराष्ट्राचे नागरिक असून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपली भूमिका मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. ते भारतात परतत असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून त्यांना पुरेशी सुरक्षा उपलब्ध करून द्यावी,” असे खडसे यांनी म्हटले.
नीट परीक्षार्थींना सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका बसला असून, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी दिपके यांनी मोहीम उभारल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे. त्यांच्या मते, या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Rohini Khadse)




