Bachchu Kadu – निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालत असल्याची टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे. काँग्रेस इतर राज्यात मराठी विषय घेऊन जाऊ शकत नाही. भाजपला बिहारपेक्षा मुंबई हवी आहे. भाजप काँग्रेसला बिहार देऊ शकते आणि मुंबई ताब्यात घेऊ शकते. ईव्हीएमचा प्रताप दाखवू शकते असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले. ईव्हीएम मशीन काँग्रेसने आणली नसती तर हे पाप नसते आले, त्यांनी चूक केली. ईव्हीएम मशीन ठेवा पण बॅलेट पेपर प्रमाणे. आम्हाला सगळी माहिती द्या. मोदीजी रामचंद्राचे भक्त असतील तर त्यावर आमचे नाव आणि क्रमांक पण असेल असे ते म्हणाले. देवाभाऊ सातबारा कोरा करतो असे बोलले होते. एकदा तरी कोरा करा. देश जाती पातीत अडकवलेला आहे. तुम्हाला आम्हाला त्यामध्ये अडकवून ठेवले आहे. आपणच भांडत राहिलो व सरकारसोबत कोण भांडणार. सगळ्या गोष्टी राजकारणासाठी नाही तर आशीर्वादासाठी कराव्या लागतात. जे तुकाराम यांनी सांगितले तेच पैगंबर यांनी सांगितले. जातीसाठी रत्नागिरीला आलो असतो तर रत्नागिरी फुल्ल झाले असते. एकदा एका मंत्र्याच्या घरात गेलो. घर ताब्यात घेतले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आला. घर सोडा. मी बोललो घर सोडतो आणि तुमच्या घरात शिरतो. त्यानंतर लगेच निर्णय झाल्याचे ते म्हणाले.