Chief Minister Devendra Fadnavis : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिला टप्प्यासाठी म्हणजेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी पुढील महिन्यात डिसेंबर २ ला मतदान होणार आहे. यामुळे भाजप कामाला लागले असून, या निवडणुकीची घोषणा होताच भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली आहेत. अनेक नेत्यांवर मोठी जबाबदारी भाजपने सोपवली आहे. थोडक्यात भाजप निवडणुकीच्या दृष्टीने अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच कोल्हापूरमधील आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. एकनाथराव आणि मी कधीकधी अदलाबदल करतो कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी मुख्यमंत्री असतो, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांना दिलं तर ते परत करतात, त्यामुळे सेफ असते असेही पुढे फडणवीस म्हणाले आहेत. कोल्हापूर येथे आयोजित सहस्त्रदर्शन सोहळा आणि सियासन या आत्मचरित्राच्या कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना फडणवीसांनी हे विधान केले आहे. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. शरद पवार यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? “आमचे एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही अदलाबदल करतच असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी ते मुख्यमंत्री असतात. कधी मी उपमुख्यमंत्री असतो, कधी ते उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्याच्या जागी ते भाषण करणार आहेत. त्यांना दिलं तर सेफ असतं, कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात. हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागेपुढे पाहिलेलं नाही. ” शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईक राज्याचे उपमुख्यमंत्री शिवेसनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हेही वाचा : “१८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी”; अंबादास दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप