E20 Fuel Impact: देशातला पहिलाच निर्णय! E20 पेट्रोलमुळे गाडीचे नुकसान, ग्राहकच्या बाजूने निकाल ; कंपनीला द्यावी लागणार नवी कार
E20 Fuel Impact: भारतात ई-२० इंधनावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका न्यायालयाने पहिल्यांदाच एका प्रकरणात निकाल दिला आहे.

E20 Fuel Impact: भारतात ई-२० इंधनावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका न्यायालयाने पहिल्यांदाच एका प्रकरणात निकाल दिला आहे. छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयाने कार मालकाच्या बाजूने निकाल दिला आहे.
मालकाचा आरोप होता की, ई-२० इंधनामुळे त्याच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि वारंवार दुरुस्ती करूनही काहीच फायदा झाला नाही, उलट खर्चच वाढला.
ग्राहकाने दावा केला की, ई-२० इंधन वापरल्यानंतर त्याच्या कारच्या इंजिनमध्ये समस्या येऊ लागल्या. इंजिनची कार्यक्षमता खालावली, मिसफायरिंग होऊ लागले आणि मायलेज कमी झाले. दुरुस्तीसाठी वारंवार कार सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊनही या समस्या कायम राहिल्या, ज्यामुळे ग्राहकाला मोठा खर्च आला.
न्यायालय कार डीलरच्या दाव्यावर असमाधानी
या प्रकरणाचा मुख्य मुद्दा हा होता की: ई-२० इंधनामुळे वाहनात बिघाड होत होता का. कार उत्पादक आणि डीलरने दावा केला की, वाहनाचे मॉडेल ई-२० इंधनावर सुरळीतपणे चालू शकते.
डीलरने असाही दावा केला की, वाहनातील समस्या मालकाच्या चुकीमुळे होत्या आणि खराब देखभाल व सामान्य झीज यामुळे वाहनात बिघाड झाला होता. मात्र, तक्रारदाराने सांगितले की, २०२४ मध्ये खरेदी केलेले वाहन आतापर्यंत उत्तम चालत होते, परंतु E20 इंधन भरल्यानंतर त्यात समस्या येऊ लागल्या.
आता, कंपनी ग्राहकाला नवीन कार देणार
कार मालकाने प्रसिद्ध कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडविरुद्ध हा खटला दाखल केला होता. सुनावणीनंतर, न्यायालयाने कंपनीला ४५ दिवसांच्या आत तक्रारदाराला त्याच मॉडेलची कार देण्याचे निर्देश दिले. ही कार E20 इंधनावरच चालली पाहिजे.
जर कंपनी असे करण्यात अयशस्वी ठरली, तर मालकाला कारची संपूर्ण किंमत, म्हणजेच ₹२०.५० लाख, परत करावी लागेल. याव्यतिरिक्त, न्यायालयाने तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासासाठी ₹१ लाख आणि खटल्याच्या खर्चापोटी ₹१०,००० ची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.
इंजिनमध्ये E20 इंधन आढळले
तक्रारदाराने ग्राहक न्यायालयासमोर पुरावा सादर केला की, त्याच्या कारच्या इंजिनमध्ये E20 इंधन जमा झाले होते. एका वर्कशॉपमध्ये दुरुस्ती करण्यात आली, पण काही दिवसांनी इंधन टाकीमध्ये एक पांढरा, चिकट द्रव आढळून आला. इंजिनचे नुकसान वाढतच गेले. ग्राहक न्यायालयाने यासाठी कार कंपनीला जबाबदार धरले.






