Dhananjay Munde । संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. दरम्यान, याच प्रकरणावरून सध्या राज्यात मागच्या महिन्याभरापासून राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. त्यातच आता छत्रपती संभाजी नगर याठिकाणी पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंडेंनी राजीनामा द्यावा Dhananjay Munde । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा भाग म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा ठराव विद्रोही साहित्य संमेलनामध्ये घेण्यात आला. सुर्यवंशी प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाईचा ठराव Dhananjay Munde । छत्रपती संभाजी नगरमध्ये आमखास मैदानावर १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी करणारा ठराव विद्रोही साहित्य संमेलनामध्ये करण्यात आलेला आहे. त्यासोबतच सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान यंत्राचा (ईव्हीएम) वापर बंद करून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी, असाही ठराव करण्यात आला. दरम्यान , आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता या प्रकरणी मस्साजोग गावाचे गावकरी उद्यापासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे संगणयत येत आहे. हेही वाचा नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वडेट्टीवारांचे वादग्रस्त वक्तव्य ; “वडेट्टीवार यांनी माफी मागावी अन्यथा…”,अनुयायी अन् भक्तांचा आक्रमक पवित्रा