‘उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय…’; भारताने पाकिस्तानची केली बोलती बंद

Petal Gahlot And Shehbaz Sharif | भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार विविध दावे केले जात आहे. यातच आता संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताविरुद्ध विजय मिळवल्याचा दावा केला. परंतु शाहबाज शरीफ यांनी केलेल्या या दाव्यानंतर भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताच्या स्थायी मिशनच्या सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानला दहशतवादावरून घेरलं आहे.
शरीफ यांच्या भाषणावर बोलताना भारतीय राजदूत पेटल गेहलोत म्हणाल्या की,” आज सकाळी या सभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नाटक केले, त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचा गौरव केला. पण कोणतंही, कितीही नाटक केलं, खोटेपणा केला तरी सत्य लपवलं जाऊ शकत नाही”
“हा तोच पाकिस्तान आहे, ज्याने 25 एप्रिल 2025 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत, जम्मू आणि काश्मीरमधील पहलाम येथील पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडाच्या जबाबदारीपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंटचे रक्षण केले,” असेही गेहलोत यांनी सुनावले. Petal Gahlot And Shehbaz Sharif |
#WATCH | New York | Exercising the right of reply of India on Pakistan PM Shehbaz Sharif’s speech, Indian diplomat Petal Gahlot says, “Mr President, this assembly witnessed absurd theatrics in the morning from the Prime Minister of Pakistan, who once again glorified terrorism… pic.twitter.com/ALR2AnDoA9
— ANI (@ANI) September 27, 2025
ढोंगीपणा, दुटप्पीपण पुन्हा एकदा सुरू
“पाकिस्तानने वर्षानुवर्षे ओसामा बिन लादेनला आश्रय दिला, लपवून ठेवलं आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याचं नाटक केलं. त्याच्या मंत्र्यांनी स्वतः कबूल केलं आहे की, पाकिस्तान अनेक दशकांपासून दहशतवादी तळ चालवत आहे. यावेळी पंतप्रधानांच्या पातळीवर हा ढोंगीपणा, दुटप्पीपण पुन्हा एकदा सुरू झाला, यात काहीच आश्चर्य वाटायला नको,” असेही त्या म्हणाल्या. Petal Gahlot And Shehbaz Sharif |
दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार
“पाकिस्तानचे पंतप्रधान ज्या विजयाबद्दल बोलत आहेत ते प्रत्यक्षात भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले एअरबेस, जळालेले हँगर आणि तुटलेल्या रनवेचे सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले फोटो आहेत. जर पाकिस्तानला हा विजय वाटत असेल तर तो त्यांना आनंद घेऊ द्या. सत्य हे आहे की, भूतकाळात जे घडलं, त्याप्रमाणेच भारताचील निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्ही आमच्या लोकांचे रक्षण करण्याचा आमचा अधिकार बजावला आहे, ” असं म्हणत गहलोत यांनी सडेतोड उत्तर दिलं.
पाकिस्तानी लष्करी अधिकारीच कुख्यात दहशतवाद्यांचा जाहीरपणे गौरव करतात
“एक फोटो हा हजारो शब्दांच्या बरोबरीचा असतो. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सेनेने बहावलपुर आणि मुरीदके येथे मारलेल्या दहशतवाद्यांचे अनेक फोटो आपण पाहिले. जेव्हा वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी अशा कुख्यात दहशतवाद्यांचा जाहीरपणे गौरव करतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहतात. जो पाकिस्तान 9 मे पर्यंत भारतावर आणखी हल्ले करण्याची धमकी देत होता, त्याच पाकिस्तानी सैन्याने 10 मे रोजी आम्हाला थेट ही लढाई थांबवण्याचे आवाहन केले होते,” असे त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले होते शहबाज शरीफ?
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ भारतावर आरोप करत म्हणाले होते की, ‘भारताने पाकिस्तानच्या निष्पाप नागरिकांवर हल्ला केला, आपल्या सशस्त्र दलांना प्रत्युत्तर द्यावे लागले. आमच्या लढवय्यांनी उड्डाण केले आणि ७ भारतीय विमाने पडली. तर सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा एकतर्फी आणि बेकायदेशीर प्रयत्न केवळ कराराच्या तरतुदींचे उल्लंघन करत नाही तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमांचेही उल्लंघन करतो,” असे शरीफ म्हणाले होते.
हेही वाचा:





