सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; पहा नेमकं काय म्हणाले…
मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आज आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले. यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’आम्ही पूर्ण समाधानी आहोत. जे लोक कालपर्यंत उड्या मारत होते, की आज सरकार जाणार… त्यांच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी केलेल्या चर्चा थोतांड होत्या, हे सुद्धा यातून समोर आलं आहे.” असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
पहा व्हिडिओ





