‘पाकिस्तानचे ९ नव्हे तर २१ दहशतवादी अड्डे…’ ; ऑपरेशन सिंदूरवर उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

Deputy Army Chief Rahul R Singh । ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने यापूर्वी पाकिस्तानमध्ये २१ दहशतवादी अड्डे ओळखले होते. ही माहिती उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग यांनी दिली. त्यांनीऑपरेशन सिंदूरविषयी बोलताना, “तंत्रज्ञान आणि गुप्तचर यंत्रणेच्या आधारे डेटा गोळा करण्यात आला होता, ज्यामध्ये २१ दहशतवादी अड्ड्यांबद्दल माहिती मिळाली होती, परंतु शेवटच्या क्षणी फक्त नऊ अड्ड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला” असा मोठा खुलासा सिंह यांनी केला आहे.
लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग यांनी FICCI च्या ‘न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज ऑर्गनायझ्ड’ कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलले. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानमधून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या संघटनांचे छावण्या अचूक हल्ल्याने उद्ध्वस्त करण्यात आले. हे छावण्या लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे होते, ज्यामध्ये प्रशिक्षण दिले जात होते, भरती होत होती, दहशतवादी गटांचे मुख्यालय आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना या लपण्यांमधून घडत होत्या. ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू करून ही अड्डे उद्ध्वस्त करण्यात आली.
फक्त २१ दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई Deputy Army Chief Rahul R Singh ।
लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग यांनी भारताच्या कारवाईवर बोलताना, ‘खरेतर २१ दहशतवादी अड्ड्या ओळखल्या गेल्या होत्या, परंतु आम्हाला वाटले की फक्त नऊ अड्ड्यांवरच कारवाई करावी. शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या तासांत, या नऊ अड्ड्यांवरच कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.’ अशी महत्वाची माहिती या कार्यक्रमात दिली. पुढे बोलताना त्यांनी,”योग्य संदेश देण्यासाठी तिन्ही सैन्यांचा दृष्टिकोन स्वीकारला जाईल कारण प्रत्यक्षात आपण एक एकात्मिक दल आहोत” असेही म्हणाले आहेत.
राहुल आर सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरवर काय म्हटले? Deputy Army Chief Rahul R Singh ।
लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग म्हणाले की,”युद्ध सुरू करणे सोपे आहे, परंतु ते नियंत्रित करणे खूप कठीण आहे, म्हणून योग्य वेळी संघर्ष थांबवणे हा योग्य निर्णय होता. लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूरमधून काही धडे शिकलो आहोत. नेतृत्वाने दिलेला धोरणात्मक संदेश स्पष्ट होता… आता अधिक वेदना सहन करण्याची संधी नाही, कारण आपण गेल्या काही वर्षांपासून त्रास सहन करत आहोत.”
ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत, लष्कराने म्हटले होते की,”दहशतवादी अड्ड्यांवरील हल्ल्यादरम्यान, कोणत्याही निष्पाप व्यक्तीला इजा होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली होती.” मात्र भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान खूपच अस्वस्थ झाला आणि या रागाच्या भरात त्यांनी ७ मे रोजी भारतातील अनेक शहरांमध्ये लष्करी अड्ड्यांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ३-४ दिवस चाललेल्या या लष्करी संघर्षानंतर, भारताने पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धबंदी करण्यास सहमती दर्शविली आणि १० मे रोजी युद्धबंदी झाली.





