”विद्यार्थी रस्त्यावर उतरले, कोचिंग मालक ताब्यात” तीन UPSC विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत काय घडलं.?

Delhi Coaching Incident । दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर भागात मुसळधार पावसानंतर राव आयएएस कोचिंग सेंटरच्या इमारतीच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तिन्ही विद्यार्थी नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होते. तिघांचेही मृतदेह तळघरातून बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांचीही ओळख पटली आहे.
तानिया सोनी (तेलंगणा), श्रेया यादव (यूपी) आणि नेविन डॅल्विन (केरळ) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहे. दिल्ली अग्निशमन विभाग (DFS) नुसार, शनिवारी संध्याकाळी सुमारे 7 वाजता राव IAS स्टडी सेंटर कोचिंगमध्ये पाणी साचल्याची माहिती मिळाली. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तेथे काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. संपूर्ण तळघर पाण्याने कसे भरले याचा शोध घेतला जात आहे.
Delhi Coaching Incident । दिल्ली सरकारने चौकशीचे आदेश दिले
दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कलम 105,106(1),152,290 आणि 35 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, तळघरात एक लायब्ररी होती, जिथे जवळपास 30-35 विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, तळघर मोठ्या प्रमाणात पाण्याने भरले होते आणि अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर करण्यात आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरले असता तेथे ठेवलेले फर्निचर तरंगू लागले, त्यामुळे बचाव करण्यात अडचण आली.
दुसरीकडे, दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ही घटना कशी घडली हे शोधण्यासाठी दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही.
Delhi Coaching Incident । विद्यार्थी रस्त्यावर उतरले, भाजपने ‘आप’ला घेरले
विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ अनेक सहकारी विद्यार्थी आंदोलन करत आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी एमसीडीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारणही सुरू झाले आहे. भाजपने याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आपला जबाबदार धरले आहे.
भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि नवी दिल्लीचे खासदार बन्सुरी स्वराज यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघाताला दिल्ली सरकारचा गुन्हेगारी निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे सचदेवा म्हणाले. जल बोर्ड मंत्री आतिशी आणि स्थानिक आमदार दुर्गेश पाठक यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा.
Delhi Coaching Incident । ‘आप’ने जोरदार प्रत्युत्तर दिले
आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी भाजपच्या आरोपांवर प्रति उत्तर दिले आहे. ते म्हणाले, पाणी निघून गेले आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी तळघरांचे लायब्ररीत रूपांतर झाले आहे. ही गुन्हेगारी कृती आहे. यावर कठोर कारवाई करावी. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोचिंग संस्थांवर कारवाई केल्याशिवाय काहीही होणार नाही. ते म्हणाले, दिल्लीची ड्रेनेज व्यवस्था खराब आहे. MCD मध्ये 15 वर्षे भाजपा होती. पण मला राजकारण करायचे नाही. भाजप राजकारण करेल, मला त्यात जायचे नाही.
Delhi Coaching Incident । स्वाती मालीवाल म्हणाल्या, ही सरळ हत्या
आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनीही घटनास्थळी भेट दिली.ही सरळ हत्या आहे. एफआयआर व्हायला हव्या. जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. सरकारी लोकप्रतिनिधींविरुद्ध एफआयआर व्हायला हव्या. मृत्युमुखी पडलेल्या मुलांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळावी. अशी मागणीही त्यांनी केली.





