पुणे – राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, दिवसभरात कोकण-गोव्यातील मुंबई, अलिबाग, पणजी या भागात पाऊस झाला. गेल्या 24 तासांत पालघर येथे तब्बल 240 मिमी, भिवंडी-150 आणि माथेरान येथे 140 मिमी पाऊस झाला.
वसईला 100, भिरा येथे 90, पेठ, अंबरनाथ, विक्रमगड परिसरात 70, गगनबावडा आणि महाबळेश्वर-50, बीड, निलंगा येथे 30 मिमी पावसाची नोंद झाली.