‘हिंमत असेल तर येऊनच दाखवा’ ; बिलावल भुट्टो यांच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्र्यांचे सडेतोड उत्तर

CR Patil on Bilawal Bhutto। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान नाराज आहे. पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांनी, जर पाणी थांबवले तर नद्यांमध्ये रक्त वाहेल”. भुट्टो यांच्या या विधानाला केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी वादग्रस्त विधान केले. भुट्टो म्हणाले होते की,” सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. त्यात आमचे पाणी किंवा त्यांचे रक्त वाहेल”. दरम्यान , केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी भुट्टो यांना फटकारले आहे. रविवारी सुरतमधील एका कार्यक्रमात त्यांनी भुट्टो यांच्या विधानाला योग्य उत्तर दिले.
भुट्ट यांच्या विधानाला सीआर पाटील यांचे उत्तर CR Patil on Bilawal Bhutto।
एका वृत्तसंस्थेनुसार सीआर पाटील यांनी, “पंतप्रधान मोदी म्हणाले होते की पाकिस्तानचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे आणि त्यानंतर बिलावल ओरडू लागले. ते म्हणत होते की जर नदीत पाणी नसेल तर भारतात रक्ताच्या नद्या वाहतील. आपण अशा लोकांना घाबरावे का? मी म्हणतो, भाऊ, कृपया शांत राहा. जर तुमच्यात ताकद असेल तर इथे या. अशा धमक्यांची काळजी न करता आम्ही आमची जबाबदारी पार पाडू आणि पाणी वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवू.” असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची कारवाई CR Patil on Bilawal Bhutto।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आतापर्यंत अनेक कठोर पावले उचलली आहेत. अटारी-वाघा सीमा बंद करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसावर बंदी घातली आहे. भारताने सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. भारताने पाकिस्तानच्या १६ युट्यूब चॅनेलवरही बंदी घातली आहे.
हेही वाचा
“दहशतवादाला पोसणार हा दुष्ट देश…” ; संयुक्त राष्ट्रात पुन्हा भारताने पाकला दाखवला आरसा





