“सत्तेवर आल्यावर सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल दिला”; कोकटेंच्या ‘त्या’ विधानानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil on Manikrao Kokate | राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्दयांवरून शेतकऱ्यांनाच सुनावले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. यातच आता याच मुद्दयावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरूनही महायुती सरकारला चिमटा काढला आहे.
जत तालुक्यातील तिकोंडी येथे जय हनुमान ग्रामीण बिगरशेती पथसंस्थेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ सोहळा प्रसंगी जयंत पाटील बोलत होते. “सत्तेवर येण्याच्या आधी ज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्यांनी सत्तेवर आल्यावर मात्र सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल दिला. सध्या मूळ प्रश्न सोडवण्यासाठी कमी प्रयत्न होत आहेत. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर 3 लाख 689 शेतकर्यांना 341 कोटी 48 लाख रुपये कर्जमाफी दिली होती. आपल्या जत तालुक्यातील 12 हजार 710 शेतकऱ्यांना 67 कोटी 64 लाख रुपये कर्जमाफी दिली,” असे जयंत पाटील म्हणाले.
“एकवेळ 1500 रुपयाचे आता 2100 रुपये पण दिली जातील. पण ते पुढच्या निवडणूकीच्या तोंडावर दिले जातील, असे म्हणत जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेच्या दिल्या जाणाऱ्या पैशावरून देखील महायुती सरकारला चिमटा काढला. आम्ही आता काही घोषणा करू शकत नाही. कारण आमचा जोरात पराभव झाला आहे,” असेही जयंत पाटील यावेळी मिश्किलपणे म्हणाले. Jayant Patil on Manikrao Kokate |
नेमकं काय म्हणाले होते कृषीमंत्री कोकाटे?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकताच नाशिक मधील अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला. त्यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल शेतकऱ्यांना केला होता. शेतकरी 5 ते 10 वर्ष वाट बघतात, तोपर्यंत कर्ज भरतचं नाहीत. सरकार शेतीमध्ये गुंतवणूकसाठी शेतकऱ्यांना पैसे देणार आहे. भांडवली गुंतवणूक सरकार करत आहे. शेतकरी करतो का? असा सवाल कोकाटे यांनी केला होता. Jayant Patil on Manikrao Kokate |
हेही वाचा:





