congress on modi electoral bond : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका तामिळ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इलेक्टोरल बॉंड विषयी प्रथमच वक्तव्य करताना जी विधाने केली आहेत त्यावर कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान रोजच ढोंगीपणाची नवी उंची गाठतात आणि अप्रामाणिकपणाची नवी खोली वाढवतात असे कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी काल आपल्या मुलाखतीत इलेक्ट्रोरल बॉंड विषयी म्हटले होते की, कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते.पण त्यातील तृटी सुधारली जाऊ शकते. थंथी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की, जे विषयावरून सध्या “नाच” करत आहेत त्यांना पश्चात्ताप होईल. | congress on modi electoral bond
त्यावर जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी तामिळ वाहिनीला दिलेल्या त्यांच्या ताज्या मुलाखतीत देशाला पुर्ण खोटी माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की ‘निधी कोठून आला, तो कसा वापरला जातो’ हे केवळ त्यांनी स्थापन केलेल्या इलेक्टोरल बाँड योजनेमुळेच कळते असे मोदी म्हणाले होते. त्यावर रमेश यांनी म्हटले आहे की, कोणी कोणाला किती निधी दिला हे कोणालाच कळू नये याच उद्देशाने ही योजना आणली गेली होती. त्यांना हा तपशील जनतेपासून लपवायचा होता. | congress on modi electoral bond
२०१८ ते २०२४ या सहा वर्षांमध्ये, कोणत्या पक्षाला कोणत्या देणगीदाराकडून निधी मिळाला याचा एकही तपशील जनतेसमोर आला नाही. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानेही योजना बेकायदेशीर ठरवून रद्द केली आहे. या देणगीदात्यांची नावे शेवटपर्यंत गुप्त ठेवण्याची योजना मोदी सरकारने आखली होती असे रमेश म्हणाले.
शेवटी सर्वोच्च न्यायालयानेच एसबीआयला हा तपशील जाहीर करणे भाग पडले रीही, रिमोट-नियंत्रित एसबीआय कोर्टात खोटे बोलली. त्यांनी हा डेटा एकत्र करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ मागितला, सोयीस्करपणे निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ मागितली. पण केवळ सर्वोच्च न्यायालय ठाम राहीले आणि त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे एसबीआयला काही दिवसांतच डेटा जाहीर करणे भाग पाडले. | congress on modi electoral bond
मोदीजी, तुमच्या पक्षाचा आणि सरकारचा मोठा भ्रष्टाचार या आकडेवारीने उघड केला आहे,असा आरोप रमेश यांनी केला.ज्यांनी भाजपला देणगी दिली त्यांनाच चार लाख कोटी रूपयांची सरकारी कंत्राटे मिळाली, त्याच कंपन्यांना पर्यावरणीय मंजुरी मिळाल्या, चंदा दो धंदा लो असे सूत्र अवलंबून त्यांनी निधी गोळा केला. जे बधले नाहीत त्यांना सीबीआय ईडीच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून खंडणी वसुली केली असे रमेश म्हणाले. ईडीच्या धमक्या देऊन त्यांनी हप्ता वसुली केली.