Congress MLA-Ram Rahim। काँग्रेस पक्षाचे आमदार परगत सिंह यांनी भगवंत मान सरकारच्या हेतूंबद्दल आणि २०१५ च्या बेकायदा प्रकरणांमध्ये न्याय देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. आम आदमी पक्ष सत्तेत आल्यानंतर डेरा सच्चा सौदा प्रमुखांशी संबंधित खटल्यांच्या फायली दाबण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदाराने माध्यमांसमोर केला. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, काँग्रेस आमदार सिंह यांनी, ‘डेरा प्रमुख राम रहीम यांच्याविरुद्ध अडीच वर्षांहून अधिक काळ खटला चालवण्यास मान्यता देण्यात आली नव्हती. विधानसभेत वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले, परंतु सरकार गप्प राहिले.’ एवढेच नाही तर परगत यांनी, “९५ आमदारांपैकी एकाही आप आमदाराने या विषयावर कधीही आवाज उठवला नाही.” असेही त्यांनी म्हटले. या फायली भगवंत मान यांच्याकडे सोपवल्या Congress MLA-Ram Rahim। काँग्रेस आमदार म्हणाले की, “आपशी संबंधित कटाचा भाग म्हणून डेरा अनुयायांविरुद्धचे खटले पंजाबबाहेर हलवण्यात आले होते आणि ज्येष्ठ वकील एचएस फूलका यांनीही हे कट जाहीरपणे उघड केले होते”. पुढे ते म्हणाले की, “मे २०२२ मध्ये आप सरकार सत्तेत आल्यानंतर, राम रहीमविरुद्ध खटला चालवण्यास मंजुरी देण्याची फाइल मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांच्याकडे गृहखातेही आहे.” अशी त्यांनी माहिती दिली. तसेच पुढे आमदार म्हणाले, ‘या प्रकरणाबाबत मी डिसेंबर २०२२ मध्ये त्यांना भेटलो. मी विधानसभेतही हा मुद्दा तीनदा उपस्थित केला होता, तरीही काहीही झाले नाही.’ परगत सिंह यांचा अकाली दलावर निशाणा Congress MLA-Ram Rahim। परगत सिंह यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आणि सत्तेत असताना पक्षाने कठोर कारवाई केल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘काँग्रेस सरकारने न्यायमूर्ती रणजित सिंह आयोग स्थापन केला होता आणि चौकशी सुरू केली होती. राहुल गांधी यांनी पंजाबला भेट दिली आणि लोकांना न्याय मिळेल असे आश्वासन दिले. कारवाई मंदावल्यानंतर काँग्रेसने आपला मुख्यमंत्री बदलला आणि एसआयटी चौकशी जलद केली.’ परगत सिंह यांनी अकाली दलावर निशाणा साधला. काँग्रेस पक्षाच्या आमदाराने पुढे म्हटले की, “जेव्हा माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी बादल कुटुंबाशी तडजोड केली आणि तपास मार्गी लावला तेव्हा न्यायाची मागणी करणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या एका गटाने पक्षाच्या उच्च कमांडशी संपर्क साधला आणि नेतृत्व बदलण्याची मागणी केली. त्यांनी अकाली दलावरही टीका केली आणि म्हटले की, ‘सुखबीर बादल यांनी डेरा प्रमुखाचे नाव एकदाही घेतले नाही कारण त्यांना फक्त त्यांची भटिंडाची जागा वाचवण्याची चिंता आहे, गुरु साहिबांच्या अपमानाबद्दल न्याय मिळवण्याची नाही.’