हैदराबाद :– के. चंद्रशेखर राव यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय आणि त्यानंतर त्यांनी आपल्या टीआरएस पक्षाचे नाव बदलून बीआरएस असे ठेवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर झाले आहे असा आरोप ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मल्लू रवी (Mallu Ravi) यांनी केला आहे.
मल्लू रवी यांनी एएनआयला सांगितले की, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना “भारत राष्ट्र समिती” लॉंच करण्याची “विनंती” केली होती आणि “कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन” करण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला आहे असा आरोपहीं त्यांनी केला.
भारत राष्ट्र समिती या पक्षाचे भाजपशी पुर्ण साटेलोटे आहे, त्यांना दिल्लीत पक्षाचे कार्यालय सुरू करण्यासाठी जमीन देण्यात आली आहे, त्यांच्यात परस्पर सामंजस्य आहे, ते फक्त भाजपशी लढण्याचे नाटक करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
Lok Sabha : सीबीआयमधील 1,673 रिक्तपदे लवकर भरली जातील यासाठी प्रयत्न सुरू – केंद्रीय जितेंद्र सिंह
त्यांचा उद्देश फक्त भाजपविरोधी मतांची विभागणी करणे आणि कॉंग्रेसच्या मतांचे तुकडे करणे हा आहे. मल्लू रवी म्हणाले, त्यांचे नियोजन काहीही असो, तेलंगणात कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल. दिल्लीतील बीआरएस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानंतर चंद्रशेखर राव यांनी राज्यातील जनतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.